नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

4kNews कामोठे  दि. 13
मुंबई : महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान, मंत्रालय परिसरात मुंडन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला शिक्षिका, शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.


आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे अनेक शिक्षकांना गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक, सामाजिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. बदली प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक आणि न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.  


शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी मुंडन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनाच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या व्यथा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा परिणाम शासनासह सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्यात आला.
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी केली. राज्यातील हजारो शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top