नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

कामोठ्यात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचा पुढाकार


दी. 18
पनवेल (4K News)कामोठे परिसरात रस्त्यावर व झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे. अस्वच्छ वातावरण, सुरक्षित निवारा व वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे या मुलांना आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यासाठी प्रतिष्ठानने पनवेल महानगरपालिकेकडे आरोग्य शिबिर घेण्याची मागणी केली होती.


दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी प्रतिष्ठानचे प्रमुख सागर दिलीप पाटील यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना निवेदन देत ही मागणी केली होती. पत्रात कुपोषण, संसर्गजन्य आजार आणि स्वच्छतेअभावी उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न टाळण्यासाठी या मुलांची नियमित आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे, असे नमूद करण्यात आले होते..



या मागणीला प्रतिसाद देत पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी २९ सप्टेंबर २०२५ रोजी कामोठ्यात आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल असे आश्वासन दिले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद भोईटे देखील उपस्थित होते.
या उपक्रमात प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. गीतेश दरेकर व यश चिले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणारे हे शिबिर कामोठ्यातील गरजू व वंचित घटकांना मोठा दिलासा देणार आहे. सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचे म्हणणे आहे की – “समाजातील प्रत्येक घटकाच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top