नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न

पनवेल(4kNews) खांदा कॉलनी येथील सिकेटी कॉलेज अर्थात चांगु काना ठाकूर महाविद्यालयामध्ये सन २००४ च्या बॅचच्या कला शाखेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.    

  
  कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ रमेश यादव व सहकारी यांनी एकत्र येऊन यावेळी जुन्या आठवणी जागृत केल्या. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला शिक्षणाचा आधार असतो आणि तोच आधार योग्यवेळी मिळाला तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध देखील घट्ट होते आणि हेच ऋणानुबंध जपण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करुन विद्यार्थी अपल्या जुन्या मित्रांसह शिक्षकांसोबत विचारांची देवाण घेवाण करतात. त्यामुळे जीवनात या स्नेहसंमेलनाला अनन्य साधारण महत्व असते.

त्या पार्श्वभूमीवर हा आनंददायी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिक्षक देखील उपस्थित होते .तसेच यावेळी सीकेटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.  आपल्या हाताखालून शिकून गेलेले विद्यार्थी आज चांगल्या उच्च पदावर असल्याचा अभिमान यावेळी शिक्षकांनी व्यक्त करत सर्वाना आशीर्वाद दिले. दरम्यान विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात जवळपास १०० हून अधिक माजी विद्यार्थी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून आले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top