नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

रक्षाबंधनासाठी जात असताना रेल्वेत लाखोंची बॅग चोरी

4k समाचार दि. 12

नवी मुंबई – रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडे जाण्याचा आनंद काही तासांतच दु:खात बदलला. सायगांव येथील सिद्धांत सायगांवकर (वय २५) हे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी पनवेलला जात असताना सोमवारी सकाळी रेल्वे प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेवर चोरट्याने हात साफ केला. या बॅगेत लाखोंच्या किमतीचा लॅपटॉप, महागडे मोबाईल फोन, चार्जर्स, तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे होती.



ही घटना मुंबईतील सायन स्थानकाजवळ घडली. सिद्धांत हे स्थानकावर पोहोचण्याआधीच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग उचलून नेली. बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली.



या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. प्रवासादरम्यान बॅग चोरी झाल्याने केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर महत्त्वाची वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे गमावल्यामुळे सायगांवकर यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.



रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना इशारा दिला आहे की, सणासुदीच्या काळात गर्दी वाढल्याने अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढतात. त्यामुळे प्रवाशांनी आपली मौल्यवान वस्तू व सामान नेहमी नजरेसमोर ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top