नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

कासाडी नदीत केमिकल्सने विषप्रयोग?; मासे आणि गुरे मृत झाल्याने शिवसेना आक्रमक

4k समाचार 
पनवेल दि.१२(वार्ताहर): पडघे गावाजवळून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणा-या कासाडी नदीत केमिकल टाकून विष प्रयोग करणा-यांवर कारवाई करा अशी तक्रार शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी केली आहे. त्या कासाडी नदीतील केमिकमुळे त्या भागातील काही गुरे आणि मासे मृत झाले असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत


पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून कासाडी नदी वाहते.पूर्वी पांढरी शुभ्र दिसणारी नदी आता प्रदूषणाने काळवंडली आहे.आजूबाजूचे कारखाने आपला घनकचरा,सांडपाणी आणि रसायने या नदीत बिनधास्त टाकतात.पडघे गावातून ही नदी वाहते.या नदीला लागून काही कारखान्यांनी कच्चे कंपाऊंड टाकले आहे.

या ठिकाणी रसायन मिश्रीत वस्तू गोण्यांमध्ये भरून ठेवले आहेत.त्यामुळे तेथे एकप्रकारे गोदाम तयार झाले आहे.याच ठिकाणाहून  हे रसायन शेजारीच असलेल्या कासाडी नदीत लपूनछपून टाकले जाते.हा प्रकार रोजचा असल्याने त्या ठिकाणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. हे केमिकल संपूर्ण नदीत पसरल्याने या भागात नदीचे पाणी पूर्ण प्रदूषित झाले आहे. 

त्यामुळे मासे आणि इतर जनावरे,गुरे मृत्यूमुखी पडले आहेत.याबाबत शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी याठिकाणी छापा टाकला.पण रसायन टाकणारे हे तेथून पळून गेले.त्यामुळे अशा प्रदूषण करणा-या कारखाने आणि व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी करावी असे देखील त्यांचे म्हणणे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top