नवीन बातम्या
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार
कळंबोली बस स्थानकातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग परत

*जिवाची पर्वा न करता बीट मार्शल यानी पाण्यात   बुडत  असलेल्या महिलेचा जीव वाचवला*
रयत शिक्षण संस्थेला ३.६२ कोटींची देणगी; लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य गौरव 
सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील करता येणार थाटात विवाह सोहळा 
थ्री स्टार राज रिसॉर्ट यांचा स्तुत्य पुढाकार
पनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्तीपनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्ती
पनवेलसाठी सिडकोने पाणी उपलब्ध करून द्यावे
खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश
रायगड जिल्ह्यातील शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार

कासाडी नदीत केमिकल्सने विषप्रयोग?; मासे आणि गुरे मृत झाल्याने शिवसेना आक्रमक

4k समाचार 
पनवेल दि.१२(वार्ताहर): पडघे गावाजवळून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणा-या कासाडी नदीत केमिकल टाकून विष प्रयोग करणा-यांवर कारवाई करा अशी तक्रार शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी केली आहे. त्या कासाडी नदीतील केमिकमुळे त्या भागातील काही गुरे आणि मासे मृत झाले असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत


पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून कासाडी नदी वाहते.पूर्वी पांढरी शुभ्र दिसणारी नदी आता प्रदूषणाने काळवंडली आहे.आजूबाजूचे कारखाने आपला घनकचरा,सांडपाणी आणि रसायने या नदीत बिनधास्त टाकतात.पडघे गावातून ही नदी वाहते.या नदीला लागून काही कारखान्यांनी कच्चे कंपाऊंड टाकले आहे.

या ठिकाणी रसायन मिश्रीत वस्तू गोण्यांमध्ये भरून ठेवले आहेत.त्यामुळे तेथे एकप्रकारे गोदाम तयार झाले आहे.याच ठिकाणाहून  हे रसायन शेजारीच असलेल्या कासाडी नदीत लपूनछपून टाकले जाते.हा प्रकार रोजचा असल्याने त्या ठिकाणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. हे केमिकल संपूर्ण नदीत पसरल्याने या भागात नदीचे पाणी पूर्ण प्रदूषित झाले आहे. 

त्यामुळे मासे आणि इतर जनावरे,गुरे मृत्यूमुखी पडले आहेत.याबाबत शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी याठिकाणी छापा टाकला.पण रसायन टाकणारे हे तेथून पळून गेले.त्यामुळे अशा प्रदूषण करणा-या कारखाने आणि व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी करावी असे देखील त्यांचे म्हणणे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top