नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख; गावांची नावे पूर्ववत 

4k समाचार  दि. 13
पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-१, आर-२, आर-३, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि या प्रयत्नांना आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले आणि अखेरीस सिडकोने गावांना त्यांची जुनी नावे परत देण्याचा निर्णय घेतला आहे.


  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघीवली वाडा, वरचे ओवळे, कोंबडभूजे, तरघर, गणेशपुरी आणि उलवे ही गावे विस्थापित झाली, पण त्यांच्या खरी ओळख जपण्याऐवजी सिडकोने त्यांना आर-१, आर-२, आर-३, आर-४, आर-५ अशी नवीन नावे दिली आणि गावांचा इतिहास व संस्कृती पुसून टाकली. या गावांना त्यांची जुनी ओळख कायम राहावी यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. त्याला आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ देऊन सिडकोने आता या गावांना जुनी ओळख कायम केली आहे.  

त्यानुसार आता जुन्या नावाची ओळख गावांना परत मिळाली असून सेक्टर आर-१ हे ‘चिंचपाडा सेक्टर आर १’,  सेक्टर आर-२ हे ‘चिंचपाडा सेक्टर आर २’, सेक्टर आर-३ हे ‘चिंचपाडा व कोल्ही सेक्टर आर ३’, सेक्टर आर-४ हे  ‘कोपर सेक्टर आर ४’, सेक्टर आर-५ हे  ‘वाघिवलीवाडा सेक्टर आर ५’, सेक्टर १ हे ‘वरचे ओवळे सेक्टर १’, सेक्टर २४ हे  ‘उलवे सेक्टर २४’, सेक्टर २५ हे ‘तरघर व कोंबडभुजे सेक्टर २५’, सेक्टर २५ ए हे ‘कोंबडभुजे व गणेशपुरी सेक्टर २५’, सेक्टर २६ हे वाघिवली सेक्टर २६, तर सेक्टर १३ हे ‘डुंगी सेक्टर ३’ या नावाने अर्थात जुन्या नावाने ओळखले जाणार आहे. 

सिडकोने पनवेल परिसरात होणाऱ्या विमानतळाच्या बांधणीसाठी चिंचपाडा, कोल्ही कोपर, पारगाव, ओवळे, कोंबडभुजे, उलवेसारख्या भागातील जमिनी संपादित केल्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला म्हणून २२.५ टक्के प्रमाणे भूखंड देण्यात आले. नवी मुंबई विमानतळ उभारताना जी गावे विस्थापित आली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन तेथे इमारती उभ्या राहिल्या. गावाचे गावपण जाते की काय असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडू लागला. भूखंडावर इमारती उभ्या राहिल्या. भूखंड सिडकोचे असल्याने त्यांना नावेही सिडकोने दिली. मात्र गावांची ओळख कायम रहावी यासाठी सिडकोकडे मागणी करण्यात आली आणि त्या मागणीला आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले. या संदर्भात सिडकोने महत्वपूर्ण निर्णय घेत गावांना आता त्यांची जुनी ओळख कायम ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top