नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

सिडको विस्थापित गावांना मिळाली जुनी ओळख; गावांची नावे पूर्ववत 

4k समाचार  दि. 13
पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-१, आर-२, आर-३, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि या प्रयत्नांना आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले आणि अखेरीस सिडकोने गावांना त्यांची जुनी नावे परत देण्याचा निर्णय घेतला आहे.


  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघीवली वाडा, वरचे ओवळे, कोंबडभूजे, तरघर, गणेशपुरी आणि उलवे ही गावे विस्थापित झाली, पण त्यांच्या खरी ओळख जपण्याऐवजी सिडकोने त्यांना आर-१, आर-२, आर-३, आर-४, आर-५ अशी नवीन नावे दिली आणि गावांचा इतिहास व संस्कृती पुसून टाकली. या गावांना त्यांची जुनी ओळख कायम राहावी यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. त्याला आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ देऊन सिडकोने आता या गावांना जुनी ओळख कायम केली आहे.  

त्यानुसार आता जुन्या नावाची ओळख गावांना परत मिळाली असून सेक्टर आर-१ हे ‘चिंचपाडा सेक्टर आर १’,  सेक्टर आर-२ हे ‘चिंचपाडा सेक्टर आर २’, सेक्टर आर-३ हे ‘चिंचपाडा व कोल्ही सेक्टर आर ३’, सेक्टर आर-४ हे  ‘कोपर सेक्टर आर ४’, सेक्टर आर-५ हे  ‘वाघिवलीवाडा सेक्टर आर ५’, सेक्टर १ हे ‘वरचे ओवळे सेक्टर १’, सेक्टर २४ हे  ‘उलवे सेक्टर २४’, सेक्टर २५ हे ‘तरघर व कोंबडभुजे सेक्टर २५’, सेक्टर २५ ए हे ‘कोंबडभुजे व गणेशपुरी सेक्टर २५’, सेक्टर २६ हे वाघिवली सेक्टर २६, तर सेक्टर १३ हे ‘डुंगी सेक्टर ३’ या नावाने अर्थात जुन्या नावाने ओळखले जाणार आहे. 

सिडकोने पनवेल परिसरात होणाऱ्या विमानतळाच्या बांधणीसाठी चिंचपाडा, कोल्ही कोपर, पारगाव, ओवळे, कोंबडभुजे, उलवेसारख्या भागातील जमिनी संपादित केल्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला म्हणून २२.५ टक्के प्रमाणे भूखंड देण्यात आले. नवी मुंबई विमानतळ उभारताना जी गावे विस्थापित आली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन तेथे इमारती उभ्या राहिल्या. गावाचे गावपण जाते की काय असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडू लागला. भूखंडावर इमारती उभ्या राहिल्या. भूखंड सिडकोचे असल्याने त्यांना नावेही सिडकोने दिली. मात्र गावांची ओळख कायम रहावी यासाठी सिडकोकडे मागणी करण्यात आली आणि त्या मागणीला आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले. या संदर्भात सिडकोने महत्वपूर्ण निर्णय घेत गावांना आता त्यांची जुनी ओळख कायम ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top