नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरु करावी : निलेश सोनावणे रिपाई पनवेल शहर अध्यक्ष
पनवेल प्रतिनिधी

4k समाचार  दि.  7
  पंढरपूरचे  विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहे , महाराष्ट्रातील या महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळाला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे इष्ट दैवत आहे. पनवेल मधून लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी च्या चरणी नतमस्तक व्हायला जातात . त्यामुळे पनवेल ते पंढरपूर अशी रेल्वे  सेवा सुरु केल्यास रेल्वे विभागाच्या महसुलात तर वाढ होईलच शिवाय आमच्या  पनवेल रायगड ,नवी मुंबई  च्या जनतेस पंढरपूरच्या  विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनास जाण्यासाठी सुलभ प्रवास होईल  याकरिता पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे . 


आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र एकादशी या एकादशीला देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक विठ्लाच्या दर्शनासाठी जात असतात त्याच प्रमाणे काही भाविक दर आठवड्याला  दर्शनासाठी जातात,विठ्ठलाच्या  भाविकांना आठवड्यातून किमान दोन वेळा तरी  रेल्वे पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरु केल्यास दर्शनासाठी सुलभ रित्या जात येईल याकरिता पनवेल ते पंढरपूर रेल्वे सुरु करावी अशी मागणी रिपाई पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी केंद्रीय   सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ,केंद्रीय  रेल्वे मंत्री  अश्विनीजी वैष्णव , रेल्वे विभागाच्या  वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top