नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्‍चित  उमेदवार लिना गर


पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. व आज कर्जत येथील मेळाव्यात त्यांनी लिना गरड यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्‍चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लिना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे.


आज पनवेल परिसरात मशालीला अनुकूल वातावरण असून मतदार मोठ्या प्रमाणात मशालीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहेत, हे दिसून आले आहे. कमी कालावधीमध्ये केलेला प्रचाराचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सुद्धा केला आहे. आज मशाल हे चिन्ह घराघरामध्ये पोहोचले असून, पनवेलमधील अनेक समस्या सोडविण्यासाठी सत्तेमध्ये गेल्यावर पनवेलमध्ये लिना गरड याच सोडवू शकतात. याचा ठाम विश्‍वास मतदारांना आहे. मालमत्ता कराचा प्रश्‍न, दुहेरी कर, शास्ती, पनवेलमधील पाण्याचा प्रश्‍न, रस्त्यावर पडलेले खड्डे, अद्ययावत हॉस्पिटल नसणे, मैदान नसणे, गार्डन नसणे यासारख्या सुविधा देण्यास पनवेलचे आमदार असफल ठरले असल्याने यंदाच्या निवडणुकीत मतदार हे 

निश्‍चितपणे महायुतीच्या पाठीमागे उभे राहून मशाली समोरचे चिन्हाचे बटण दाबतील. बाळाराम पाटील यांना समज देवू सुद्धा ते आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरत आहेत. तसेच अनेक वेळा प्रचाराला जाताना आमच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. परंतु या धमक्यांना आम्ही भीक घालत नसून आम्ही बाहेरील उमेदवार असलो तरी आता पनवेलमध्ये आम्ही समरस झालो आहोत.

त्यामुळे मतदार सुज्ञ आहेत. शिक्षित आहे. जो नागरिकांचे प्रश्‍न सोडवू शकतो अशा उमेदवारांच्या पाठीमागे नागरिक ठामपणे उभे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेच फक्त बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ फिरत आहेत. तर या उलट त्यांचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या बरोबर ठामपणे उभे असल्याने येत्या 23 तारखेला निवडणुकीच्या वेळी ते दिसून येईलच. पनवेलचा विकास करण्यासाठी मला बहुमताने निवडून द्या असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top