नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

सवाई गंधर्व महोत्सवात राष्ट्रीय कलाकारांची रंगली स्वर मैफल
रायगड नवी मुंबईचे सुपुत्र पं. उमेश चौधरींच्या सुरेल गायनाने उजळली रंगभूमी 


4k समाचार दि. 20
पनवेल (प्रतिनिधी) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सुवर्ण परंपरेला उजाळा देणारा पं. सवाई गंधर्व संगीत महोत्सव कुंदगोल येथील सवाई गंधर्व स्मारक भवन येथे दोन दिवसांच्या भव्य आयोजनात पार पडला. पं. सवाई गंधर्व यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त, कर्नाटक सरकारच्या कन्नड व संस्कृती विभागाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाने रसिकांना संगीताचा अनुपम असा आनंद दिला. या दोन दिवसीय महोत्सवात देशभरातील नामवंत कलाकारांनी आपल्या गायन-वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गायकांसोबत रायगड नवी मुंबईचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांनीही आपल्या शास्त्रीय संगीत गायनाचा ठसा उमटवला.पं. उमेश चौधरी यांनी सुरेल रचना सादर करून वातावरण भारून टाकले. रागातील नेमकेपणा, आवाजातील मधुरता आणि तालातील सुंदर समन्वयामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित संगीत प्रेमींकडून भरभरून दाद मिळाली. 


    महोत्सवाचे उद्घाटन मान्यवर महंतांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. अरविंद काटगी होते. यावेळी जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रख्यात गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना “सवाई गंधर्व राष्ट्रीय संगीत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.पहिल्या दिवशी पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, विदुषी पद्मिनी राव, पं. उमेश चौधरी, पं. कृष्णचंद्र वाडिकर, विद्वान द्वारकानाथ आणि पं. रतन मोहन शर्मा यांच्या सादरीकरणांनी सभागृह दुमदुमले. 

तर दुसऱ्या दिवशीच्या समारोप सत्रात पद्मश्री म. वेंकटेश कुमार, पं. गणपत भट, पं. विनोद दिग्राजकर, पं. बी. एस. मठ, विदुषी अक्कामहादेवी मठ, श्रीमती वीणा शिवानंद, पं. अशोक नादगीर आणि शास्वती चौहान यांच्या सुरावटींनी रसिक मंत्रमुग्ध झाले. तबला साथीसाठी पं. रवींद्र यावगल, डॉ. उदय कुलकर्णी, श्री. कृष्णकुमार कुलकर्णी, पं. विनायक नाईक, पं. अल्लामप्रभू कडकोळ, श्रीहरी दिग्गवी व श्री. बसवराज हिरेमठ यांनी उत्कृष्ट वादन केले. हार्मोनियमवर डॉ. सुधांशू कुलकर्णी, श्री. बसवराज कुमार आणि उपेंद्र शशबुद्धे यांनी सुरेल साथ दिली. टाळ्यांचा गजर, आनंदमयी वातावरण आणि संगीताच्या माधुर्यात रंगलेल्या या महोत्सवाने केवळ पं. सवाई गंधर्व यांच्या स्मृतींना अभिवादन केले नाही, तर शास्त्रीय संगीताच्या परंपरेलाही नवा उजाळा दिला. त्याबद्दल आयोजक मंडळाने सर्व मान्यवर, कलाकार व रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top