नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

पाणीपट्टी करावरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना लागू करा – माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी 


 
4k समाचार दि. 25
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत (अभय योजना) लागू करून १०० टक्के शास्ती माफ करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  


या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत सध्या मालमत्ता धारकांसाठी अभय योजना लागू केली असून सदर योजनेचा नागरीक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेचे थकीत मालमत्ता कर देखील जमा होण्यास मदत होत आहे. याच धार्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांकडून पाणी पट्टी करावरील शास्ती माफ करण्यासाठी देखील अभय योजना लागू करावी अशी मागणी होत आहे. 

त्यामुळे पाणी पट्टी करावरील ही शास्ती १०० टक्के माफ करण्याकरीता पनवेल महानगरपालिकेकडून अभय योजना लागू करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन नागरीक वेळेत पाणी पट्टी बीले भरतील व पनवेल महानगरपालिकेस थकीत पाणी पट्टी कर जमा होण्यास मदत होईल व पनवेल महानगरपालिकेच्या उत्पन्नात देखील भर पडेल. या सर्व विषयाचे महत्वपूर्ण गांभिर्य लक्षात घेता पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत देण्यासाठी अभय योजना लागू करुन १०० टक्के शास्ती माफ करण्याकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, असेही माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आपल्या निवेदनात अधोरेखित केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top