4kNews कामोठे दि. 28
साई ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री नरसू पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेच्या सुमारे अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता आणि विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान केले होती आणि हातात भगवे झेंडे घेतले होते. विठू नामाच्या गजरात टाऊनशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

यावेळी जे एन पी ए चे अधिकारी वर्ग उपस्थित होते त्यामध्ये मा. श्री सयाजीराव साळुंखे साहेब मॅनेजर इस्टेट जे एन पी ए, मा. श्री प्रवीण पाटील साहेब लेबर वेल्फेअर ऑफिसर जे एन पी ए आणि मा. श्री संदीप घरत मॅनेजर जे एन पी ए यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रशासकीय अधिकारी मा. श्री रमाकांत गावंड सर, माध्यमिक मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री गिरीश पाटील सर, बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे मॅडम, माध्यमिक इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री भूषण जाधव सर आणि श्री अंकुश जोगळे सर यांनी केले.

सुरुवातीला शाळेचे आदर्श पिटी शिक्षक श्री मनोहर टेमकर सर यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे महाराष्ट्राचे पारंपारिक नृत्य लेझीमच्या गजरात स्वागत केले. यानंतर रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी शाळेचे संगीत शिक्षक पंडित श्री गणेश बंडा सर यांनी आणि विद्यार्थ्यांनी भजन केले.दिंडी शिस्त आणि फलक लेखन कलाशिक्षक श्री. मिलिंद ठाकूर यांनी उत्तमप्रकारे केले.या रिंगण सोहळ्यात सर्व मान्यवरांनी सहभाग घेतला. जे एन पी ए चे उपस्थित सर्व अधिकारी विद्यार्थ्यासोबत नृत्याच्या भक्तीरसात दंग झाले. प्रमुख पाहुण्यांनी फुगडी देखील घातली.

यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी श्री विठ्ठलाची मनोभावे पूजा केली. यावेळी साईट ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री नरसू पाटील सर यांनी सर्व मान्यवरांचे झाडाचे रोप देऊन स्वागत केले. यावेळी मा श्री सयाजीराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेने आषाढी एकादशीची दिंडी काढताना पर्यावरणाचा संदेश दिल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक तरी झाड लावले पाहिजे आणि ते जगविले पाहिजे असे आवाहन केले. तसेच इयत्ता दहावी आणि स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करावे असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी साई ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री नरसू पाटील सर यांनी शाळेच्या इतिहासात अशाप्रकारे प्रथमच भव्य दिव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले असे म्हटले. तसेच तसेच मराठी माध्यमाचा निकाल गेली अनेक वर्ष सातत्याने 100% लागत आहे. तसेच तालुक्यातील मराठी माध्यमात पहिले चार विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत असे म्हटले. इंग्रजी माध्यमाचा निकाल उत्तम आहे. यावर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळतील असे आश्वासन त्यांनी मान्यवरांना दिले.

त्यानंतर संगीत शिक्षक श्री गणेश बंडा सर त्यांनी महाआरती घेतली. यामध्ये सर्व प्रमुख मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी भजनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी स्वरा कांबळे आणि यांनी सुंदर अभंग गायले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या सहशिक्षिका श्रीमती वंदना कपूर मॅडम आणि माध्यमिक इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका श्रीमती कीर्ती शिरसाठ मॅडम, श्री किशोर म्हात्रे सर यांनी केले.आषाढी एकादशीच्या अभंगवाणी कार्यक्रमात इंग्रजी व मराठी माध्यमाचे इयत्ता दहावीचे खालील विद्यार्थी सहभागी होते

कु.स्वरा कांबळे,कु.प्रियांसी डाकी,कु.अविष्कार घोडके,कु.जिग्नेश,कु.तन्मय कोळी,कु.कार्तिक ठाकूर त्याचबरोबर या पर्यावरण रक्षण दिंडी सोहळ्यामध्ये शाळेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या भक्तिभावाने सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.

