नवीन बातम्या
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य
NIEPID RC NM खारघरचे घवघवीत यश!
नृत्य व संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा
मेहफिल-ए-अनुराग’मध्ये शास्त्रीय संगीताचा सुरेल आविष्कार ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा सांस्कृतिक सोहळा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित
उरण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
बाप्पा मोरया’ घरगुती गणपती सजावट स्पर्धा
भाजपतर्फे आयोजन; २५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके
अदानी एअरपोर्ट्समध्ये ९,८२५ कोटींची गुंतवणूक
विमानतळ विस्तार, आधुनिकीकरण आणि ‘एअरपोर्ट सिटी’ विकासाला मिळणार चालना
१०३ निविदांमध्ये ६५ ते ७० टक्के कमी दराने निविदाअत्यल्प दरामुळे कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; भरत पाटील यांची सखोल चौकशीची मागणी
तंत्रज्ञान आणि विश्वासामुळे NBFC-HFC क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा : RBI उपराज्यपाल एस. सी. मुर्मू
कर्करोग उपचारासाठी केवळ वय हा निकष नसावा
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

4kNews कामोठे दि. 10
पनवेल (प्रतिनिधी) : उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा परिसराच्या विकासासाठी १८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, या निधीतून प्रस्तावित विविध विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणीबाबत करंजा सोसायटी येथे बैठक घेण्यात आली. आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला मत्स्यपालन विभागाचे अधिकारी, करंजा सोसायटीचे पदाधिकारी आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते.



करंजा परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायाशी संबंधित अडचणी, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. बैठकीत स्थानिक नागरिकांच्या समस्या व सूचनाही जाणून घेण्यात आल्या. प्रस्तावित कामांना पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जात असल्याचे सांगण्यात आले. .



“मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्राधान्य आहे. १८० कोटींच्या निधीतून करंजा परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल. कामे केवळ कागदावर न राहता वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. बैठकीस जयविंद्र कोळी, नारायण नाखवा, राजेश नाखवा, भारत नाखवा, सागर नाखवा, शिवदास कोळी यांच्यासह मच्छीमार बांधव, पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top