नवीन बातम्या
Open Channels FM: Why Real-Time Threat Detection Matters for Website Security
नैना विकासाला मोठी चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती, शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय 
रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष पवार
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे जिल्हास्तरीय बाल सुरक्षा व वाहतूक विषयक बैठक संपन्न;
पनवेल शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अनुसूचित जाती-जमातीच्या उप-वर्गीकरणाला तीव्र विरोध; पनवेल प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन
पनवेल येथील डॉक्टरांची वारकरी भवन पंढरपूर येथे आरोग्य सेवा संपन्न.
ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनचे उद्घाटन; सचिन केणी यांना सरचिटणीसपदाची संधी
शिक्षण क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर ही काळाची गरज
— सुप्रसिद्ध विकासक अशोक छाजेड
पर्यावरणमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

कळंबोली–कामोठे वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजनांची मागणी ; शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक निकम यांचे वाहतूक विभागाला निवेदन; बेकायदेशीर पार्किंग, बंद सिग्नल आणि अवजड वाहनांवर कारवाईची मागणी

4kNews  कामोठे
पनवेल, दि. 28 (वार्ताहर) : कळंबोली, कामोठे आणि खांदा कॉलनी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग व विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख दीपक रामचंद्र निकम यांनी कळंबोली वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


निवेदनानुसार, कळंबोली, कामोठे व खांदा कॉलनी परिसरात वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अंतर्गत रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगमुळे रस्ते अरुंद होत असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे सकाळी आणि सुट्टीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल दीर्घकाळापासून बंद असून वाहतूक पोलिसांची उपस्थिती अपुरी असल्याने समस्या अधिक गंभीर बनल्याचे निकम यांनी म्हटले आहे.
याशिवाय कळंबोली स्टील मार्केट परिसर, रोडपाली सिग्नल ते कळंबोली सर्कलदरम्यान रस्त्याच्या कडेला अवजड ट्रक व ट्रेलर उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. अवजड वाहनांच्या प्रवेशबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


निवेदनाद्वारे अंतर्गत रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंगविरोधात विशेष मोहीम, शाळा व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती, बंद वाहतूक सिग्नल तातडीने सुरू करणे, अवजड वाहनांवर कठोर कारवाई आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा दीपक निकम यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top