नवीन बातम्या
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला

महाविकास आघाडीची भूमिका मान्य नसल्यामुळे बाहेर पडतोय” – माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका

पनवेल, (4K News)– “मी आजही शेतकरी कामगार पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मात्र महाविकास आघाडीची भूमिका पटत नसल्यामुळे मी त्यातून बाहेर पडत आहे,” असे स्पष्ट वक्तव्य नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले.

म्हात्रे यांनी सांगितले की, “गेल्या ४८ वर्षांपासून मी शेकापच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती मी नेहमी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत माझा मुलगा प्रितम म्हात्रे उरण मतदारसंघातून शेकापच्या तिकिटावर उभा असताना, महाविकास आघाडीने त्याच्या विरोधात काम केले. परिणामी, आमचा निसटता पराभव झाला.”



“या प्रकाराची माहिती मी पक्षश्रेष्ठींना वेळोवेळी दिली आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली. पण पक्षाने ती मागणी मान्य केली नाही. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांसह आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी आणखी सांगितले की, “शेकापच्या अलीकडील कार्यक्रमांमध्ये मला डावलण्यात आले. अक्षय तृतीयेला पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनात व बैठकीत मला बोलावण्यात आले नाही. तरीही मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कार्यालयात जाऊन पाया पडलो.”

येत्या सोमवारी पनवेल, उरण व खालापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली असून, “पुढील राजकीय दिशा ही कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार ठरेल. त्यांचाच निर्णय अंतिम असेल,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

“आमचे आधीपासून व्यवसाय आहे. त्यामुळे काही जण मला दुसऱ्या पक्षात गेलोय असे म्हणत आहेत, पण मी अपक्ष राहिलो तरी माझे काम थांबणार नाही,” असे स्पष्टीकरण देत त्यांनी अफवांना फाटा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top