नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

महाविकास आघाडीची भूमिका मान्य नसल्यामुळे बाहेर पडतोय” – माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका

पनवेल, (4K News)– “मी आजही शेतकरी कामगार पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मात्र महाविकास आघाडीची भूमिका पटत नसल्यामुळे मी त्यातून बाहेर पडत आहे,” असे स्पष्ट वक्तव्य नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले.

म्हात्रे यांनी सांगितले की, “गेल्या ४८ वर्षांपासून मी शेकापच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती मी नेहमी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत माझा मुलगा प्रितम म्हात्रे उरण मतदारसंघातून शेकापच्या तिकिटावर उभा असताना, महाविकास आघाडीने त्याच्या विरोधात काम केले. परिणामी, आमचा निसटता पराभव झाला.”



“या प्रकाराची माहिती मी पक्षश्रेष्ठींना वेळोवेळी दिली आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली. पण पक्षाने ती मागणी मान्य केली नाही. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांसह आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी आणखी सांगितले की, “शेकापच्या अलीकडील कार्यक्रमांमध्ये मला डावलण्यात आले. अक्षय तृतीयेला पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनात व बैठकीत मला बोलावण्यात आले नाही. तरीही मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कार्यालयात जाऊन पाया पडलो.”

येत्या सोमवारी पनवेल, उरण व खालापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली असून, “पुढील राजकीय दिशा ही कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार ठरेल. त्यांचाच निर्णय अंतिम असेल,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

“आमचे आधीपासून व्यवसाय आहे. त्यामुळे काही जण मला दुसऱ्या पक्षात गेलोय असे म्हणत आहेत, पण मी अपक्ष राहिलो तरी माझे काम थांबणार नाही,” असे स्पष्टीकरण देत त्यांनी अफवांना फाटा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top