नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ पनवेलमध्ये महाविकास आघाडीची तिरंगा यात्रा


पनवेल दि.२१(वार्ताहर): जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी पनवेलमध्ये बुधवारी (दि. २१ मे) सकाळी १० वाजता महाविकास आघाडीच्यावतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तिरंगा यात्रेत महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


          यात्रेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. तर पनवेल शहरातून यात्रा काढून काँग्रेस भवन येथे तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत भारत मातेचा जयजयकार करण्यात आला. तसेच ‘पाकिस्तान मुर्दाबाद- आतंकवाद मुर्दाबाद’ म्हणत दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला.


       यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हाती ‘तिरंग्याखाली चालतो भारत मातेला वंदन करतो, हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माता की जय, भूदल नौदल हवाईदल जिंदाबाद, भारतीय सैन्याचे आभार, दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सेनेचा अभिनंदन, सैन्याच्या सन्मानार्थ भारतीय नागरिक एकत्र’, अशा घोषणा लिहिलेले फलक होते. यावेळी ‘हिंदुस्तान जिंदाबाद-पाकिस्तान मुर्दाबाद, दूध मांगोगे तो खीर देंगे काश्मीर मांगोगे तो चीर देंगे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
         याप्रसंगी माजी आमदार हुस्नबानू खलीफे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिकापचे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, जिल्हा चिटणीस राजेश केणी, अनिल ढवळे, माजी नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका शशिकला सिंग, निर्मला म्हात्रे,

युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, कॅप्टन कलावत,अवचित राऊत, दीपक घरत, नोफिल सय्यद, अमित लोखंडे, जसविंदर सैनि, शशिकांत बांदोडकर,सुरेश पाटील,कांती गंगर, बबन केणी, शिल्पा पाठक, मनोज बिरादार,सुदेशना रायते,जयश्री खटकले, आरती ठाकूर  नीता शेनोय, कलावती माळी, माधुरी गोसावी, यतीन देशमुख, अरुण कुंभार, शौकत खान, प्रमोद भगत, शंकर म्हात्रे, विलास फडके, देवेंद्र मडवी,जयेश लोखंडे, चेतन म्हात्रे,रमेश राव, रमेश गोवारी,प्रविण जाधव, विश्वनाथ मते, किरण सोनावणे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top