नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

गेल्या पाच वर्षांत श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयविकार असलेल्या ६१९ बालरुग्णांवर  यशस्वी शस्त्रक्रिया

4k समाचार दि. 14
मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करून जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त सुमारे ६१९ बालरुग्णांना नवे आयुष्य मिळाले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या नेतृत्वाखाली ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ प्रकल्पांतर्गत तसेच प्रकल्पाचे अध्यक्ष पीपी नितीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. जमा झालेल्या पैशातून ६१९ बालरुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 

या बालरुग्णांना मिळालेल्या नव्या आयुष्याचा आनंद साजरा करण्यासाठी, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रुग्णालयतील बालरुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
हृदयविकार असलेल्या बालरुग्णांवर शस्त्रक्रिया ही एक आव्हानात्मक व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हृदयातील छिद्रे, ऱ्हदयाच्या झडपांसंबंधीत समस्या किंवा असामान्य रक्तवाहिन्या यासारख्या आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. यावर वेळीच उपचार न केल्यास दम लागणे, मुलांची वाढ खुंटणे, वारंवार संसर्ग होणे आणि अकाली मृत्यू यासारख्या गंभीर गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. दरवर्षी, भारतात २ लाखांहून अधिक मुलं जन्मजात हृदयविकारांसह जन्माला येतात आणि सुमारे ७०,००० मुलांना जन्मल्यानंतर वर्षभरातच शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. मात्र आर्थिक अडचणी आणि जागरूकतेच्या अभावामुळे, अनेक मुलांना वेळीच उपचार मिळत नाही.



रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि गिफ्ट ऑफ लाईफ प्रकल्पाचे अध्यक्ष पीपी नितीन मेहता सांगतात की, प्रत्येक मुलाला निरोगी हृदयासह जगण्याची संधी मिळायला हवी. आपल्या देशातील अशी अनेक मुलं आहेत जी कोणत्या ना कोणत्या ऱ्हदयविकाराशी झुंजत आहेत असून त्यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांना या आजाराशी शेवटच्या श्वासापर्यंत लढावे लागते. ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ उपक्रमाद्वारे, अशा बालरुग्णांपर्यंत पोहोचण्याता प्रयत्न करत आहोत. शस्त्रक्रियेनंतर जेव्हा मी एका मुलाला हसताना पाहतो तेव्हा मला कळते की आम्ही त्यांना उपचाराबरोबरच नव्या आयुष्याची भेट दिली आहे. हे दान नसून हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. मी या मोहिमेचा भाग असल्याचा मला खरोखरच अभिमान वाटतो.

श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या वरिष्ठ सल्लागार आणि बालरोग हृदयरोग शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभात रश्मी सांगतात की, हृदयविकाराने जन्माला येणारे बाळ अनेकदा कमकुवत दिसतात, त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, ते पुरेसा आहार घेऊ शकत नाही किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांची त्वचा निळसर पडते. जन्मजात हृदयविकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजारांवर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात जीवघेण्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते. काही बाळांना जन्मानंतर काही आठवडे किंवा काही महिन्यांत शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. या सगळ्या नाजूक, गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत. परंतु यामुळे त्या बाळाचे आयुष्य वाचविता येते. वेळीच निदान, जन्मानंतर केले जाणारे स्क्रीनिंग किंवा इकोकार्डियोग्राम तपासण्या यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जितक्या लवकर या आजाराचे निदान होते तितकीच जगण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते.


वेळीच उपचार केल्यास केवळ गुंतागुंत टाळता येत नाही तर मुलाला इतर कोणत्याही बाळाप्रमाणेच निरोगी आणि सक्रिय राहता येते व जगण्याची दुसरी संधी मिळते. शस्त्रक्रियेस विलंब झाल्यास हृदयविकार, विकास खुंटणे तसेच मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच याबाबत पुरेशी  जागरूकता, नियमित तपासणी आणि दर्जेदार उपचारांची उपलब्धता गरजेची आहे. या समारंभात सहभागी झालेले दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना सांगतात की, या धाडसी मुलांना भेटणे खरोखरच हृदयस्पर्शी होते. त्यांचे धाडस आणि रुग्णालय आणि रोटरी क्लबद्वारे केली जाणारे निःस्वार्थ मदत खरेखरच प्रेरणादायी आहे. वेळीच उपचाराने एखाद्याचे अमुल्य जीवन वाचविता येते याची प्रचिती याठिकाणी आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top