4k सामाचार दि. 16 खारघर(प्रतिनिधी) खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या भागातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकृत माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. बेलापूर येथील सिडको भवनामध्ये बुधवारी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. […]
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव मिळणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेला ठोस आश्वासन
पुणे (4K News)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार असून प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा केंद्र सरकार आदर करेल, असे ठोस आश्वासन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी पुणे येथील सरितानगरी येथे आयोजित जनता दरबारात ना. मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी […]
नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने व्हावे – पत्रकारांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी..
मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले. पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले […]
नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने व्हावे – पत्रकारांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी
मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले. पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले […]
कामोठे, सेक्टर 18 चा पेट्रोल पंप नागरिकांच्या सेवेत दाखल होणार – भाजप पदाधिकाऱ्यांची ग्वाही
कामोठे शहरातील नागरिकांना गेली तीन वर्षे प्रतीक्षा असलेला सेक्टर 18 येथील पेट्रोल पंप आता लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कामोठे :25 Sep (4K समाचार)आज कामोठे मंडळ भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या पेट्रोल पंपाची पाहणी करून थेट मालकांशी संपर्क साधला. मंडळ अध्यक्ष विकास घरत व समाजसेवक रवी गोवारी यांनी पंप मालकांशी दूरध्वनीवर संवाद साधत अडचणी […]
दि.बा. पाटील यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाची मागणी..
पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेकडून सिडको व पोलिसांना निवेदन, २६ सप्टेंबरला धरणे आंदोलन.
पनवेल (4K News) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला काहीच दिवस शिल्लक असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या दैवत मानल्या जाणाऱ्या स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था रस्त्यावर उतरणार आहे. संस्थेच्यावतीने सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि बेलापूर […]
महिलांच्या आत्मविश्वासासाठी कामोठ्यात नवा उपक्रम…
कामोठे (4K News) समाजात महिलांनीही आत्मविश्वासाने आणि सहजपणे इंग्रजीत संवाद साधावा, मुलाखतीत आपली छाप पाडावी आणि सार्वजनिक ठिकाणी निर्धास्तपणे बोलावे, या उद्देशाने सागरभाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कामोठ्यातील मुली आणि महिलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सद्वारे केवळ भाषा शिकवली जाणार नाही, तर आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि […]
सर्वपित्री अमावस्येला खड्ड्यांचे श्राद्ध – नागरिकांची अनोखी हाक!
कामोठे (4K News)परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सर्वत्र खड्ड्याच खड्डे असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या काळात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिकेकडून केवळ एकच उत्तर मिळते – “पाऊस कमी झाल्यावर काम करू”… पण जोपर्यंत अपघात होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अलीकडेच […]
पुढील वर्षी होणार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाने दिली 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली: (4Kसमाचार)गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या मुदतवाढीच्या मागणीला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ओबीसी […]
भारत–पाक सामना – जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे
काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निर्दोष पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश हादरला. भारतीय सेनेने धाडसी कारवाया करून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या जखमा आजही ताज्याच आहेत. शहिदांच्या बलिदानाची सावली अजूनही जनमानसावर आहे. अशा वेळी भारत–पाक क्रिकेट सामना खेळवण्यास परवानगी देणे हे भारतीयांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे आहे. सरकारने […]