नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने व्हावे – पत्रकारांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी

मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले.



पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले की विमानतळाचे नामकरण हा केवळ औपचारिक वा प्रशासकीय विषय नसून स्थानिक भूमिपुत्रांच्या भावनांचा व हक्कांचा प्रश्न आहे. दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आयुष्यभर लढा दिला असून त्यांचे नाव विमानतळाला मिळणे ही खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

ही मागणी ऐकल्यानंतर ना. आठवले यांनी तातडीने केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. उद्घाटनापूर्वीच या मागणीवर गांभीर्याने विचार व्हावा, यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, विवेक पाटील, संजय कदम, केवल महाडिक, शंकर वायदंडे, गौरव जाहगीरदार, लालचंद यादव, गणपत वारगडा, चंद्रकांत शिर्के, शैलेश चव्हाण, विशाल सावंत, भूषण साळुंके, दीपक घरत, राम बोरीले आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top