नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल(प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी घेतला. पाणीपुरवठ्यामध्ये येणार्‍या तुटीची भरपाई करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योजनेचे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सूचित केले.


पनवेल महापालिकेत झालेल्या या बैठकीला प्रांताधिकारी पवन चांडक, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता रमेश वायदंडे, श्री. वेगुर्लेकर, एमएसआरडीसीचे श्री. करंजकर, मनपा उपायुक्त गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पनवेल शहर वरिष्ठ निरीक्षक पोलीस नितीन ठाकरे, खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे आदी उपस्थित होते.


   या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सूक्ष्म स्तरावर पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांबाबत या वेळी समाधान व्यक्त करण्यात आले. योजनेच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पूर्ण सहकार्य करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले.या योजनेचे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांचा समन्वय सुनिश्चित करण्यात आला. योजनेच्या वेळेत अंमलबजावणीसाठी उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदारांनी पूर्ण बांधिलकी दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top