नवीन बातम्या
पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल, पिरकोन चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
एम एन आर शाळेच्या बाजूला  बेकायदेशीर आणि घातक वस्तूंच्या विक्रीवर कडक कारवाईची मागणी
५ व्या इंडिया तायक्वांडो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पनवेलच्या खेळाडूंची निवड
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचा डंका; २ सुवर्ण अन् २ कांस्यपदकांवर कोरले नाव
आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वशेणी येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श
Open Channels FM: Software Lock-In and AI Tools for Modern Web Businesses
How to Get a 90+ PageSpeed Score in WordPress for Free (Measured)
Open Channels FM: How AI Agents Target Open Source and Why Storage Is the New AI Bottleneck
पनवेल शहरातील नागरी समस्याबाबत प्रहार संघटनेने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन !! 

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने व्हावे – पत्रकारांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी..

मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले.



पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले की विमानतळाचे नामकरण हा केवळ औपचारिक वा प्रशासकीय विषय नसून स्थानिक भूमिपुत्रांच्या भावनांचा व हक्कांचा प्रश्न आहे. दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आयुष्यभर लढा दिला असून त्यांचे नाव विमानतळाला मिळणे ही खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

ही मागणी ऐकल्यानंतर ना. आठवले यांनी तातडीने केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. उद्घाटनापूर्वीच या मागणीवर गांभीर्याने विचार व्हावा, यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, विवेक पाटील, संजय कदम, केवल महाडिक, शंकर वायदंडे, गौरव जाहगीरदार, लालचंद यादव, गणपत वारगडा, चंद्रकांत शिर्के, शैलेश चव्हाण, विशाल सावंत, भूषण साळुंके, दीपक घरत, राम बोरीले आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top