नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने व्हावे – पत्रकारांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी..

मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले.



पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले की विमानतळाचे नामकरण हा केवळ औपचारिक वा प्रशासकीय विषय नसून स्थानिक भूमिपुत्रांच्या भावनांचा व हक्कांचा प्रश्न आहे. दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आयुष्यभर लढा दिला असून त्यांचे नाव विमानतळाला मिळणे ही खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

ही मागणी ऐकल्यानंतर ना. आठवले यांनी तातडीने केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. उद्घाटनापूर्वीच या मागणीवर गांभीर्याने विचार व्हावा, यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, विवेक पाटील, संजय कदम, केवल महाडिक, शंकर वायदंडे, गौरव जाहगीरदार, लालचंद यादव, गणपत वारगडा, चंद्रकांत शिर्के, शैलेश चव्हाण, विशाल सावंत, भूषण साळुंके, दीपक घरत, राम बोरीले आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top