पनवेल (4K News) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला काहीच दिवस शिल्लक असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या दैवत मानल्या जाणाऱ्या स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था रस्त्यावर उतरणार आहे.


संस्थेच्यावतीने सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि बेलापूर सीबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना २६ सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांना निवेदन देण्यात आले.


रायगड व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी विकासाच्या दृष्टीने आपली जमीन विमानतळासाठी दिली. त्यांच्या या त्यागाचा सन्मान म्हणूनच विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी संस्थेने केली आहे. राज्य सरकारने देखील मंत्रिमंडळाचा ठराव पारित करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असून, तरीही केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था २६ सप्टेंबरला एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, विवेक पाटील, संजय कदम, केवल महाडिक, राज भंडारी, विशाल सावंत, सनीप कलोते, लालचंद यादव, आण्णासाहेब आहेर, चंद्रकांत शिर्के, तसेच महिला पदाधिकारी रुपाली शिंदे आणि दीपाली पारसकर आदी उपस्थित होते.
या वेळेस पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे सदस्य गौरव जहागीरदार, सुनील पाटील, शैलेश चव्हाण, सुनील वारगडा, अनिल कुरघुडे, सुनील भगत आणि इतर सदस्य काही कारणामुळे आज उपस्थित राहू शकले नाही म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली पण ते 26 तारखेच्या धरणे आंदोलनाला नक्कीच उपस्थित राहतील असे त्यांनी सांगितले.
