नवीन बातम्या
हृदयातील ब्लोकेजमुळे पत्रकार गौरव जहागिरदार उपचारासाठी मदतीच्या प्रतीक्षेत
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले

नवी मुंबई विमानतळ नामकरण लढ्यात पत्रकारांची दिल्ली दणक्यात एन्ट्री


4k समाचार दि. 1
पनवेल प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता पत्रकारांची एकजूट मोठा बळ देत आहे. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या शिष्टमंडळाने दिल्ली गाठत केंद्रीय नागरी विमानन व हवाई उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना अधिकृत निवेदन सादर केले. 



यावेळी नायडू यांच्या कार्यालयाने सकारात्मक भूमिका घेत विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, पत्रकारांच्या या भूमिकेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या संघटित प्रयत्नांचे कौतुक करून त्यांचा लढा न्याय्य असल्याचे स्पष्ट केले.



सुरुवातीपासूनच पत्रकारांचा दबाव
विमानतळाच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांच्या भावना जपल्या जाव्यात, या भूमिकेतून पत्रकारांनी सिडको प्रशासनाला निवेदन देऊन धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. सिडकोकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊनही पत्रकारांनी दि. बां.च्या नावाची मागणी ठामपणे मांडली होती.



दिल्लीमध्ये व्यापक पाठपुरावा
दिल्ली भेटीदरम्यान पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या शिष्टमंडळाने केवळ केंद्र सरकारकडेच नव्हे, तर विरोधी पक्षातील काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही निवेदन दिले. या सर्व भेटींमुळे ‘विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे’ ही मागणी आणखी तीव्र झाली आहे. 



पत्रकारांचा एकजूट लढा
या शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, विवेक पाटील, संजय कदम, निलेश सोनावणे, केवल महाडिक, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, गणपत वारगडा, शंकर वायदंडे यांसह अनेक पत्रकार सहभागी झाले होते.
स्थानिकांच्या भावनांचा आदर राखत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी सुरू असलेला पत्रकारांचा संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top