नवीन बातम्या
पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*
आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नितीन ठाकरे यांची पदोन्नती; बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून सत्कार
आंतरराष्ट्रीयअंमली पदार्थ नशा-मुक्ती दिनानिमित्त पनवेलमध्ये जनजागृती कार्यक्रमपनवेल,
फक्त रोख रक्कम चोरणारा सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात
शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा उपक्रम 1 जुलै रोजी
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी बाळा कुंभार तर उरण पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी पृथ्वीराज घोरपडे
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे केरळमधून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत

नवी मुंबई विमानतळ नामकरण लढ्यात पत्रकारांची दिल्ली दणक्यात एन्ट्री


4k समाचार दि. 1
पनवेल प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता पत्रकारांची एकजूट मोठा बळ देत आहे. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या शिष्टमंडळाने दिल्ली गाठत केंद्रीय नागरी विमानन व हवाई उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना अधिकृत निवेदन सादर केले. 



यावेळी नायडू यांच्या कार्यालयाने सकारात्मक भूमिका घेत विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, पत्रकारांच्या या भूमिकेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या संघटित प्रयत्नांचे कौतुक करून त्यांचा लढा न्याय्य असल्याचे स्पष्ट केले.



सुरुवातीपासूनच पत्रकारांचा दबाव
विमानतळाच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांच्या भावना जपल्या जाव्यात, या भूमिकेतून पत्रकारांनी सिडको प्रशासनाला निवेदन देऊन धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. सिडकोकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊनही पत्रकारांनी दि. बां.च्या नावाची मागणी ठामपणे मांडली होती.



दिल्लीमध्ये व्यापक पाठपुरावा
दिल्ली भेटीदरम्यान पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या शिष्टमंडळाने केवळ केंद्र सरकारकडेच नव्हे, तर विरोधी पक्षातील काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही निवेदन दिले. या सर्व भेटींमुळे ‘विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे’ ही मागणी आणखी तीव्र झाली आहे. 



पत्रकारांचा एकजूट लढा
या शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, विवेक पाटील, संजय कदम, निलेश सोनावणे, केवल महाडिक, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, गणपत वारगडा, शंकर वायदंडे यांसह अनेक पत्रकार सहभागी झाले होते.
स्थानिकांच्या भावनांचा आदर राखत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी सुरू असलेला पत्रकारांचा संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top