नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

चिंद्रनमधील भूसंपादनाविरोधातील आंदोलन तीव्र; महिलांचा पाण्यात उतरून निषेध

4k समाचार दि. 15

नवी मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाने (MIDC) केलेल्या भूसंपादनाला अन्यायकारक ठरवत तळोजा परिसरातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाने आता अधिक तीव्र रूप धारण केले आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी चिंद्रन गावातील महिलांनी पाण्यात उभे राहून आपला तीव्र संताप व्यक्त केला.



सहभागी महिलांपैकी काहींची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भूसंपादन करताना योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची हमी न दिल्याने त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top