नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

चिंद्रनमधील भूसंपादनाविरोधातील आंदोलन तीव्र; महिलांचा पाण्यात उतरून निषेध

4k समाचार दि. 15

नवी मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाने (MIDC) केलेल्या भूसंपादनाला अन्यायकारक ठरवत तळोजा परिसरातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाने आता अधिक तीव्र रूप धारण केले आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी चिंद्रन गावातील महिलांनी पाण्यात उभे राहून आपला तीव्र संताप व्यक्त केला.



सहभागी महिलांपैकी काहींची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भूसंपादन करताना योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची हमी न दिल्याने त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top