नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कामोठेकरांचा पुढाकार — सहा लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा हात!


4k समाचार दि. 16
कामोठे : सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत कामोठे रहिवाशी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे आणि जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने बीड व शेवगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत अभियान राबविण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष पोपट शेट आवारी यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सहा लाख रुपये मूल्याच्या दोन गाड्या जीवनावश्यक वस्तू गरजू शेतकऱ्यांना पाठवण्यात आल्या. 



या उदात्त कार्यात कामोठेतील अनेक महिलांनी पुढाकार घेतला. सुवर्णा वाळुंज, वर्षा चौधरी, प्रमिला आहेर, गीता उंडे, रंजना ढवन, प्रीती खिलारी, संजना वाघमारे, सुप्रिया माने, सुरेखा गुंजाळ, संगीता पवार, पुष्पा पोटे, उषा आवारी, साबळे ताई, सत्रे ताई, सुजाता चेडे, मनीषा वनवे, शारदा तोंडे, विनंती आंधळे, रंजना शिंदे, लता मोरे, ज्ञानेश्वर सत्रे, शोभा डेरे, ज्योती शिकारे, मंगल आवारी, शुभांगी कड, सुनिता वाबळे, रोहिणी डेरे, जाधव ताई, वनिता वाबळे, पल्लवी आवारी या सर्व कार्यकर्त्यांनी कामोठ्यात फिरून वस्तू गोळा केल्या आणि त्यांचे व्यवस्थित पॅकिंग केले.



पुरुष कार्यकर्त्यांमध्ये दादाभाऊ वाळुंज, संदीप पोटे, योगेश चौगुले, अनिल पोटे, रवी बोहोत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच पोपटशेठ आवारी, सुरेश ढवन, आत्माराम आरोटे, बाबाजी ढोमे यांनी स्वतः बीड व शेवगाव येथे जाऊन वस्तू प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक आणि बीड-शेवगाव येथील ग्रामस्थांनी मंडळाच्या या मानवतावादी कार्याचे मनापासून कौतुक केले. 



मंडळाचे अध्यक्ष पोपटशेठ आवारी यांनी सांगितले,
“जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी संकटात असताना आपण त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला, हेच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळीचे समाधान आहे.”
हा उपक्रम समाजातील ऐक्य, दयाभाव आणि सहकार्य याचे उत्तम उदाहरण ठरला असून कामोठेकरांच्या सामाजिक संवेदनशीलतेचा गौरव करणारा क्षण ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top