नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कामोठेकरांचा पुढाकार — सहा लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा हात!


4k समाचार दि. 16
कामोठे : सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत कामोठे रहिवाशी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे आणि जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने बीड व शेवगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत अभियान राबविण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष पोपट शेट आवारी यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सहा लाख रुपये मूल्याच्या दोन गाड्या जीवनावश्यक वस्तू गरजू शेतकऱ्यांना पाठवण्यात आल्या. 



या उदात्त कार्यात कामोठेतील अनेक महिलांनी पुढाकार घेतला. सुवर्णा वाळुंज, वर्षा चौधरी, प्रमिला आहेर, गीता उंडे, रंजना ढवन, प्रीती खिलारी, संजना वाघमारे, सुप्रिया माने, सुरेखा गुंजाळ, संगीता पवार, पुष्पा पोटे, उषा आवारी, साबळे ताई, सत्रे ताई, सुजाता चेडे, मनीषा वनवे, शारदा तोंडे, विनंती आंधळे, रंजना शिंदे, लता मोरे, ज्ञानेश्वर सत्रे, शोभा डेरे, ज्योती शिकारे, मंगल आवारी, शुभांगी कड, सुनिता वाबळे, रोहिणी डेरे, जाधव ताई, वनिता वाबळे, पल्लवी आवारी या सर्व कार्यकर्त्यांनी कामोठ्यात फिरून वस्तू गोळा केल्या आणि त्यांचे व्यवस्थित पॅकिंग केले.



पुरुष कार्यकर्त्यांमध्ये दादाभाऊ वाळुंज, संदीप पोटे, योगेश चौगुले, अनिल पोटे, रवी बोहोत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच पोपटशेठ आवारी, सुरेश ढवन, आत्माराम आरोटे, बाबाजी ढोमे यांनी स्वतः बीड व शेवगाव येथे जाऊन वस्तू प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक आणि बीड-शेवगाव येथील ग्रामस्थांनी मंडळाच्या या मानवतावादी कार्याचे मनापासून कौतुक केले. 



मंडळाचे अध्यक्ष पोपटशेठ आवारी यांनी सांगितले,
“जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी संकटात असताना आपण त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला, हेच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळीचे समाधान आहे.”
हा उपक्रम समाजातील ऐक्य, दयाभाव आणि सहकार्य याचे उत्तम उदाहरण ठरला असून कामोठेकरांच्या सामाजिक संवेदनशीलतेचा गौरव करणारा क्षण ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top