नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड


विवेक गोविंदराव पवार यांनी भगवान बुद्ध विहार व जुहू चौपाटी येथे महापुरुषांना केले अभिवादन


4k समाचार  दि. 4

मुंबई (प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.) मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज सामाजिक ऐक्य आणि विचारांची परंपरा जपत विविध ठिकाणी महापुरुषांना अभिवादन केले.



सकाळी त्यांनी भगवान गौतम बुद्ध विहार येथे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांना त्यांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण ठेवून समाजामध्ये बंधुत्व, समानता आणि शांततेचा संदेश देण्याचे आवाहन केले.



यानंतर महात्मा गांधी जयंती निमित्त विवेक पवार यांनी जुहू चौपाटी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपित्याला वंदन करत त्यांनी गांधीजींच्या अहिंसा, सत्य आणि सामाजिक एकतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमांमधून विवेक गोविंदराव पवार यांनी महान नेत्यांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाचा संदेश दिला. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top