नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार




4k समाचार दि. 4
मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे, येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीला दिली आहे. 


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचे नाव मिळावा यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या ताकदीवर जोरदार लढा देण्यात आला. आंदोलने, मोर्चे, मानवी साखळी, बैठक, जनजागृती, लाखो भूमिपुत्रांच्या उपस्थितीत सिडको घेराव आंदोलन अशा अनेक प्रकारे लढा देण्यात आला. दिबांच्या नावाचा जोरदार गजर करण्यात आला.  आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिबासाहेबांच्या नाव देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले की, या विमानतळासाठी एकच नाव पाठवण्यात आले आहे. आम्ही विमानतळाला तेच नाव देणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नवी मुंबई विमानतळाचा विषय देखील होता. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राज्य सरकारचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. तसेच या संदर्भातील सर्व अधिकार राज्य सरकारकडे देण्यात येतील. या संदर्भातील ठराव मंजूर होऊन राज्याला तो अधिकार दिला जाईल. त्या कामासाठी जो वेळ लागेल त्यानुसार येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू असे त्यांनी समितीला आश्वासित केले. 


 या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे वने मंत्री गणेश नाईक, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार राजू पाटील,  दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, कॉम्रेड भूषण पाटील, संतोष केणे, नंदराज मुंगाजी, यांच्यासह सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top