नवीन बातम्या
पनवेलमध्ये साडेनऊ लाखांची वीज चोरी उघड; एकावर गुन्हा दाखल
सेनेची बांधणी अधिक मजबूत करण्याासाठी पनवेलमध्ये बैठक संपन्न

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पनवेल महानगरपालिकेची शिवसेना शाखा तोड कारवाई परतावली
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %
बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह 
सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान संपन्न

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे पनवेल मनपाला थेट आव्हान; पनवेल मनपा मतदार यादीतील १२,१४३ दुबार नावे हटवा

4kNews दि. 7

पनवेल दि.7(वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका (PMC) सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तोंडावर एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे! महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत थेट १२,१४३ दुबार आणि संशयित मतदारांची नावे घुसल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला आहे. 


  सदर नावे जिल्ह्याबाहेरील, म्हणजेच नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील असल्यामुळे, आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त/प्राधिकृत अधिकारी (मतदार यादी) यांना तातडीने निवेदन देऊन या ‘महागोंधळा’वर कारवाईची मागणी केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक मतदारच असणे कायद्याने बंधनकारक असताना, पनवेल मनपाच्या यादीत नवी मुंबईतील मतदारांचा ढिग आढळला आहे. बेलापूर मतदारसंघ (विधानसभा १५१) ते पनवेल मनपा यादीत ६,१३८ दुबार/संशयित नावे तर ऐरोली मतदारसंघ (विधानसभा १९०) ते पनवेल मनपा यादीत ६,००५ दुबार/संशयित नावे असून या संशयित मतदारांची संख्या एकूण १२,१४३ इतकी आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, विधानसभा मतदार याद्यांची प्रभाग निहाय फोड करून स्थानिक निवडणुकांची यादी तयार केली जाते.

मात्र,पनवेल मनपाच्या यादीत जिल्ह्याबाहेरील मतदार घुसल्याने मतदानाच्या वैधतेवरच थेट आक्षेप घेण्यात आला आहे. प्रारूप यादीवर हरकती घेण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबर २०२५ होती.यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळली होती, पण त्यावेळी कोणतीही कठोर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे यंदा याच ‘बोगस’ मतदारांच्या जीवावर निवडणुकीचे निकाल फिरवले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शिरीष घरत यांनी मागणी केली आहे की, या १२,१४३ दुबार मतदारांची कठोर शाहनिशा करावी आणि अंतिम यादीत त्यांच्या नावांसमोर विशिष्ट चिन्हांकन करावे. तसेच, मतदाराचे मतदान एकाच केंद्रात होण्यासाठी नियोजन करण्याची विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे. जर या त्रुटी वेळीच सुधारल्या नाहीत, तर संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि निकालावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top