नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

पनवेल महापालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उपोषणाचा इशारा


पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आणि आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला वळवली गावाचे पाणी बंद करुन पाणी दिल्याबद्दल शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेने तीव्र संताप व्यक्त करून आज पनवेल महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चव्हाण यांची भेट घेवून या संदर्भात त्यांना निवेदन दिले आहे.


यावेळी शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्‍वास पेटकर, शिवमंदिर कमिटी अध्यक्ष मारुती पाटील, अशोक कान्हा पाटील, मा.सरपंच वळवली दिलीप पाटील, शाखाप्रमुख वळवली प्रवीण पाटील आदींनी या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली.

संघर्ष करून मिळवलेल्या पाण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. पनवेल महानगर पालीका हद्दीतील वळवली गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झाली असून पाच दिवसातुन एकदाच पाणी मिळते, त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वळवली, टेंभोडेला आलेल्या पाण्याच्या लाईनमधून परस्पर आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला जोडुन महानगरपालिका हद्दीतील वळवली ग्रामस्थांवर अन्यायच केला आहे. पाणीपुरवठा कमी येतो म्हणून टॅकरने पाणी पुरविले जाते.

ते पण अपूर्णच असते. टँकर लांबीने केलेली कृत्रीम पाणीटंचाई आहे असे वाटते. तरी तातडीने याची दखल घेवून वळवली, टेंभोडेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना कराव्यात व त्याची अंमलबजावणी करण्यास सांगावे अन्यथा आगामी काळात मोर्चा आंदोलन, उपोषण, घेराव यापैकी कोणताही प्रकारचा अवलंब केला जाईल असा इशारा अध्यक्ष विश्‍वास पेटकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top