नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

पनवेल महापालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उपोषणाचा इशारा


पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आणि आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला वळवली गावाचे पाणी बंद करुन पाणी दिल्याबद्दल शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेने तीव्र संताप व्यक्त करून आज पनवेल महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चव्हाण यांची भेट घेवून या संदर्भात त्यांना निवेदन दिले आहे.


यावेळी शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्‍वास पेटकर, शिवमंदिर कमिटी अध्यक्ष मारुती पाटील, अशोक कान्हा पाटील, मा.सरपंच वळवली दिलीप पाटील, शाखाप्रमुख वळवली प्रवीण पाटील आदींनी या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली.

संघर्ष करून मिळवलेल्या पाण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. पनवेल महानगर पालीका हद्दीतील वळवली गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झाली असून पाच दिवसातुन एकदाच पाणी मिळते, त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वळवली, टेंभोडेला आलेल्या पाण्याच्या लाईनमधून परस्पर आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला जोडुन महानगरपालिका हद्दीतील वळवली ग्रामस्थांवर अन्यायच केला आहे. पाणीपुरवठा कमी येतो म्हणून टॅकरने पाणी पुरविले जाते.

ते पण अपूर्णच असते. टँकर लांबीने केलेली कृत्रीम पाणीटंचाई आहे असे वाटते. तरी तातडीने याची दखल घेवून वळवली, टेंभोडेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना कराव्यात व त्याची अंमलबजावणी करण्यास सांगावे अन्यथा आगामी काळात मोर्चा आंदोलन, उपोषण, घेराव यापैकी कोणताही प्रकारचा अवलंब केला जाईल असा इशारा अध्यक्ष विश्‍वास पेटकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top