नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

पनवेल महापालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उपोषणाचा इशारा


पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आणि आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला वळवली गावाचे पाणी बंद करुन पाणी दिल्याबद्दल शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेने तीव्र संताप व्यक्त करून आज पनवेल महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चव्हाण यांची भेट घेवून या संदर्भात त्यांना निवेदन दिले आहे.


यावेळी शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्‍वास पेटकर, शिवमंदिर कमिटी अध्यक्ष मारुती पाटील, अशोक कान्हा पाटील, मा.सरपंच वळवली दिलीप पाटील, शाखाप्रमुख वळवली प्रवीण पाटील आदींनी या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली.

संघर्ष करून मिळवलेल्या पाण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. पनवेल महानगर पालीका हद्दीतील वळवली गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झाली असून पाच दिवसातुन एकदाच पाणी मिळते, त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वळवली, टेंभोडेला आलेल्या पाण्याच्या लाईनमधून परस्पर आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला जोडुन महानगरपालिका हद्दीतील वळवली ग्रामस्थांवर अन्यायच केला आहे. पाणीपुरवठा कमी येतो म्हणून टॅकरने पाणी पुरविले जाते.

ते पण अपूर्णच असते. टँकर लांबीने केलेली कृत्रीम पाणीटंचाई आहे असे वाटते. तरी तातडीने याची दखल घेवून वळवली, टेंभोडेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना कराव्यात व त्याची अंमलबजावणी करण्यास सांगावे अन्यथा आगामी काळात मोर्चा आंदोलन, उपोषण, घेराव यापैकी कोणताही प्रकारचा अवलंब केला जाईल असा इशारा अध्यक्ष विश्‍वास पेटकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top