नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल महापालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उपोषणाचा इशारा


पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आणि आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला वळवली गावाचे पाणी बंद करुन पाणी दिल्याबद्दल शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेने तीव्र संताप व्यक्त करून आज पनवेल महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चव्हाण यांची भेट घेवून या संदर्भात त्यांना निवेदन दिले आहे.


यावेळी शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्‍वास पेटकर, शिवमंदिर कमिटी अध्यक्ष मारुती पाटील, अशोक कान्हा पाटील, मा.सरपंच वळवली दिलीप पाटील, शाखाप्रमुख वळवली प्रवीण पाटील आदींनी या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली.

संघर्ष करून मिळवलेल्या पाण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. पनवेल महानगर पालीका हद्दीतील वळवली गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झाली असून पाच दिवसातुन एकदाच पाणी मिळते, त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वळवली, टेंभोडेला आलेल्या पाण्याच्या लाईनमधून परस्पर आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला जोडुन महानगरपालिका हद्दीतील वळवली ग्रामस्थांवर अन्यायच केला आहे. पाणीपुरवठा कमी येतो म्हणून टॅकरने पाणी पुरविले जाते.

ते पण अपूर्णच असते. टँकर लांबीने केलेली कृत्रीम पाणीटंचाई आहे असे वाटते. तरी तातडीने याची दखल घेवून वळवली, टेंभोडेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना कराव्यात व त्याची अंमलबजावणी करण्यास सांगावे अन्यथा आगामी काळात मोर्चा आंदोलन, उपोषण, घेराव यापैकी कोणताही प्रकारचा अवलंब केला जाईल असा इशारा अध्यक्ष विश्‍वास पेटकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top