नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

शेकापचे उरण विधानसभा अध्यक्ष मयुर सुतार यांचे व्ही के राज रेसिडेन्सी द्रोणागिरीच्या रहिवाश्यांनी मानले  आभार.



उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
२०१२ साली ३४ ग्राहकांनी उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड मध्ये साईनाथ डेव्हलोपर्स या बिल्डर कडे घर खरेदी करण्यासाठी बुकिंग केली होती.तब्ब्ल ३ कोटिहून अधिक रक्कम भरून ग्राहकांनी येथे रूम बुकिंग केले होते. पैसे सुद्धा ग्राहकांनी बिल्डरला अदा केले होते.परंतु साईनाथ डेव्हलोपर्स यांनी सर्वांची फसवणूक करत फरार झाला होता.त्यावेळी सर्व ग्राहक अडचणीत आले होते. संकटात सापडले होते.सर्वच पर्याय वापरले पण पैसे परत मिळत नव्हते.त्यावेळचे खासदार, आमदार, आजी माजी राजकीय नेते यांच्याकडेही न्याय मागितला पण कोणीही न्याय दिला नाही. न्यायालयात सुद्धा ग्राहक गेले पण न्याय मिळाला नाही.ग्राहकांनी तब्ब्ल १२ वर्षे प्रयत्न केले पण त्यांना कोणीही न्याय दिला नाही.

पण तारणहार म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष मयूर सुतार हे देवासारखे सर्वांसाठी धावून गेले.त्यांनी वारंवार प्रयत्न करून सर्व ग्राहकांचे पैसे त्यांना व्याजासकट मिळवून दिले.त्यामुळे सर्व ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले.मयूर सुतार यांच्या मुळे ग्राहकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.या कामी मयूर सुतार यांनी कोणत्याही ग्राहकांकडुन किंवा कोणत्याही व्यक्ती कडुन एकही रुपया घेतला नाही. निस्वार्थी पणाने त्यांनी हे कार्य केले आहे त्यामुळे द्रोणागिरी नोड मधील व्ही के राज रेसिडेन्सी द्रोणागिरीच्या सर्व रहिवाश्यांनी मयूर सुतार यांचे आभार मानले आहेत.

किरण घरत , जयवंत भोईर , भगवान भोईर , सुरेश भोईर , अशोक गावडे , सागर कोळी , पुस्पलता देसाई , आंनद कजारिया , कांता भोईर , हितेश पाटील , वैभव पाटील , अजीज नेरेकर , राजश्री म्हात्रे , दीपाली पाटील , गणेश गायकवाड , राजवीर रजोलिया , सुनिल प्रजापती, सुनिल ढोलकीया, राजेश मयेकर आदी रहिवाशी यांनी मयूर सुतार यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top