नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

शेकापचे उरण विधानसभा अध्यक्ष मयुर सुतार यांचे व्ही के राज रेसिडेन्सी द्रोणागिरीच्या रहिवाश्यांनी मानले  आभार.



उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
२०१२ साली ३४ ग्राहकांनी उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड मध्ये साईनाथ डेव्हलोपर्स या बिल्डर कडे घर खरेदी करण्यासाठी बुकिंग केली होती.तब्ब्ल ३ कोटिहून अधिक रक्कम भरून ग्राहकांनी येथे रूम बुकिंग केले होते. पैसे सुद्धा ग्राहकांनी बिल्डरला अदा केले होते.परंतु साईनाथ डेव्हलोपर्स यांनी सर्वांची फसवणूक करत फरार झाला होता.त्यावेळी सर्व ग्राहक अडचणीत आले होते. संकटात सापडले होते.सर्वच पर्याय वापरले पण पैसे परत मिळत नव्हते.त्यावेळचे खासदार, आमदार, आजी माजी राजकीय नेते यांच्याकडेही न्याय मागितला पण कोणीही न्याय दिला नाही. न्यायालयात सुद्धा ग्राहक गेले पण न्याय मिळाला नाही.ग्राहकांनी तब्ब्ल १२ वर्षे प्रयत्न केले पण त्यांना कोणीही न्याय दिला नाही.

पण तारणहार म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष मयूर सुतार हे देवासारखे सर्वांसाठी धावून गेले.त्यांनी वारंवार प्रयत्न करून सर्व ग्राहकांचे पैसे त्यांना व्याजासकट मिळवून दिले.त्यामुळे सर्व ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले.मयूर सुतार यांच्या मुळे ग्राहकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.या कामी मयूर सुतार यांनी कोणत्याही ग्राहकांकडुन किंवा कोणत्याही व्यक्ती कडुन एकही रुपया घेतला नाही. निस्वार्थी पणाने त्यांनी हे कार्य केले आहे त्यामुळे द्रोणागिरी नोड मधील व्ही के राज रेसिडेन्सी द्रोणागिरीच्या सर्व रहिवाश्यांनी मयूर सुतार यांचे आभार मानले आहेत.

किरण घरत , जयवंत भोईर , भगवान भोईर , सुरेश भोईर , अशोक गावडे , सागर कोळी , पुस्पलता देसाई , आंनद कजारिया , कांता भोईर , हितेश पाटील , वैभव पाटील , अजीज नेरेकर , राजश्री म्हात्रे , दीपाली पाटील , गणेश गायकवाड , राजवीर रजोलिया , सुनिल प्रजापती, सुनिल ढोलकीया, राजेश मयेकर आदी रहिवाशी यांनी मयूर सुतार यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top