नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

महाराष्ट्र सरकारची सिख समाजाबाबत ऐतिहासिक पावले : भाई जसपालसिंह सिद्धू



4k समाचार दि. 10
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र सिख समाजाच्या ११ सदस्यीय वेल्फेअर कमिटीचे प्रमुख भाई जसपालसिंह सिद्धू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नरीमन पॉइंट, मुंबई येथील ‘भारत रत्न’ राजीव गांधी इन्श्टिट्यूट येथे भेट घेतली. या भेटीत सिख समाजाच्या अग्नी बंजारा, लबाना आणि सिक्खलिंगायत बंधूंबाबत संबंधित भटक्या जातीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.या प्रसंगी भाई हरनामसिंह खालसा, हॅपी सिंग सदस्य महाराष्ट्र राज्य अल्पसंख्य आयोग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मिळून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला आणि आभार मानले.


       भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिख समाजाशी निगडित विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली. भाई जसपालसिंह सिद्धू यांनी सांगितले की, ही भेट केवळ विकास व कामकाजापुरती मर्यादित नव्हती, तर महाराष्ट्र सिख समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ऐतिहासिक ठरणारी ठरली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यामुळे लबाना आणि सिक्ख लिंगायत समाजाच्या आरक्षणासंबंधीच्या समस्या सुटल्या आहेत. 

समाजाच्या हितासाठी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे भावी पिढ्यांना शिक्षण, नोकरी आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. भाई जसपालसिंह सिद्धू म्हणाले की, “ही केवळ सुरुवात आहे. महाराष्ट्र सिख समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” त्यांनी विशेषत: हे अधोरेखित केले की, २०२४ पासून महाराष्ट्र सिख समाजाच्या गरजा व प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही गतीमान होईल. 


      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top