नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

कोकण ज्ञानपीठ मध्ये विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन


4k समाचार

उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, आणि आपले मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोबाईल किती वापरावा. आई-वडिलांबरोबर संवाद कसा साधावा, किती वेळ साधावा, शिक्षकांबरोबर चर्चा संवाद कसा करावा मित्रांमध्ये संवाद कसा असावा मोबाईल वापरला नाही तर काय फायदे होतील. मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा, व्यक्तिमत्व विकास कसे घडवावे, रोजगाराच्या संधी कशा मिळव्यात, ज्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवायच्या नसतील तर  व्यवसाय कसा निवडावा  या सर्व विविध घटकांविषयी अतिशय उद्बोधक अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. 

महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक व्ही एस इंदुलकर यांनी विद्यार्थ्यांनी आपले व्यवसाय कसे निवडावे त्यासाठी करिअर कट्टा कसा आपणास उपयोगी ठरू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे  यांनी विद्यार्थ्यांना सुरेख असे मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थी कसा असावा विद्यार्थ्यांनी रोजगार व्यवसाय निवडताना कोणती काळजी घ्यावी. आपल्या आई-वडिलांचे गुरुजनांचे संस्कार आपल्या आचरणात आणावेत. करिअर कट्टाचा भरपूर उपयोग करून घ्यावा. शिक्षणाबरोबर इतर कोर्सेस, जागतिक भाषा, व्यवसाय निवड यांचे तंत्र आत्मसात करावीत आणि आपण बेरोजगार मुक्त राहावं आणि देशाची सेवा करावी. त्यानंतर करिअर संसदची मुख्यमंत्री कु. प्राप्ती संतोष पांगुळ या विद्यार्थिनीने मान्यवरांचे आणि सर्व उपस्थित  यांचे आभार मानले. डॉ. डी पी  हिंगमिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. जगताप एच के  यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. सदर कार्यक्रमाला डॉ. पी आर कारुळकर डॉ. अरुण चव्हाण डॉ. एम जी लोणे  डॉ. अनुपमा कांबळे प्रा. थावरे प्रा. रियाज पठाण प्रा. हन्नत  शेख प्रा. विनिता तांडेल तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top