4k News दि 13
नवी मुंबई : २५ डिसेंबर रोजी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या पहिल्या विमान उड्डाणाला आजाद समाज पार्टीने तीव्र विरोध दर्शविला आहे. विमानतळावर स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
.
आजाद समाज पार्टीच्या वतीने यापूर्वी १ ऑगस्ट २०२५ रोजी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे रोजगाराच्या मागणीसाठी पहिले आंदोलन करण्यात आले होते. यावेळी विमानतळ प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बहुजन समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणींना, जे अनेक वर्षांपासून नवी मुंबईत वास्तव्यास आहेत, त्यांना रोजगाराच्या संधींपासून डावलण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीच्या वतीने १८ डिसेंबर रोजी संपूर्ण नवी मुंबईत बेरोजगार युवक-युवतींना कामधंदा मिळावा यासाठी व्यापक संघर्ष छेडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिकांना न्याय मिळेपर्यंत आणि विमानतळावरील रोजगारात प्राधान्य देण्यात येईपर्यंत लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.आजाद समाज पार्टी नवी मुंबई युवा अध्यक्ष श्री. नितेश यादव यांनी स्पष्ट केले

