नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

२५ डिसेंबरच्या पहिल्या विमान उड्डाणाला आजाद समाज पार्टीचा विरोध

4k News दि 13

नवी मुंबई : २५ डिसेंबर रोजी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या पहिल्या विमान उड्डाणाला आजाद समाज पार्टीने तीव्र विरोध दर्शविला आहे. विमानतळावर स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

.



आजाद समाज पार्टीच्या वतीने यापूर्वी १ ऑगस्ट २०२५ रोजी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे रोजगाराच्या मागणीसाठी पहिले आंदोलन करण्यात आले होते. यावेळी विमानतळ प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बहुजन समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणींना, जे अनेक वर्षांपासून नवी मुंबईत वास्तव्यास आहेत, त्यांना रोजगाराच्या संधींपासून डावलण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे.



या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीच्या वतीने १८ डिसेंबर रोजी संपूर्ण नवी मुंबईत बेरोजगार युवक-युवतींना कामधंदा मिळावा यासाठी व्यापक संघर्ष छेडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिकांना न्याय मिळेपर्यंत आणि विमानतळावरील रोजगारात प्राधान्य देण्यात येईपर्यंत लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.आजाद समाज पार्टी नवी मुंबई युवा अध्यक्ष श्री. नितेश यादव  यांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top