नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेलच्या नितळस परिसरात बिबट्याचा वावर
आमदार प्रशांत ठाकूर यांची तहसीलदारांकडे उपाययोजनेची मागणी



4k समाचार दि. 14
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील नितळस गाव परिसरात अलिकडच्या काही दिवसांत बिबट्याच्या हालचाली, त्यांच्या उपस्थितीची चिन्हे आणि संचारकाळातील दृश्ये समोर आली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पाहणी व स्थळभेट आयोजित करून या विषयावर प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


  या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, नितळस गाव परिसरात नागरिकांची सुरक्षितता, जंगल क्षेत्रातील नियंत्रण तसेच बिबट्याला विनाव्यत्यय सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या अनुषंगाने वन विभाग, महापालिका व पोलीस विभाग यांच्यात समन्वय होणे आणि प्रत्यक्षस्थळी संयुक्त पाहणी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण संबंधित वन विभाग अधिकारी पोलीस अधिकारी व स्थानिक प्रशासनासोबत प्रत्यक्षस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा. 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती मार्गदर्शक सूचना देऊन योग्य ती उपाययोजना तातडीने राबवावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे. बिबट्याचा वावर लक्षात घेता परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे, नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे, आवश्यक तेथे पिंजरे व तांत्रिक साधनांची उपलब्धता तसेच हेल्पलाइन व सूचना प्रणाली मजबूत करणे आवश्यक असल्याचेही तहसीलदार मिनल भामरे यांना दिलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top