4kNews कामोठे दि. 12
पिसार्वे गावातील गामी बिल्डरने सुरू असलेल्या बांधकामामुळे गावातून बाहेर जाणारा नैसर्गिक नाला बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने पावसाळ्यात गावात पाणी साचण्याची व नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर रोहिंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांनी गामी बिल्डरला इशारा दिला आहे. “गावातील नैसर्गिक नाला तात्काळ पूर्ववत करून पाण्याचा मार्ग मोकळा करावा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित पावले उचलावीत, असेही नंदकुमार म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.

