नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा



उरण, दि. १९ (विठ्ठल ममताबादे) : पनवेल तालुक्यातील रिटघर गावाने गेल्या ५२ वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा अखंडपणे जपली आहे. १९७४ मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजही गावकऱ्यांच्या एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.



सुमारे २१०० लोकसंख्या आणि ४०० उंबरठे असलेल्या रिटघर गावात प्रत्येक घरात स्वतंत्र गणपतीची स्थापना न करता जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हनुमान मंदिरात सामूहिक गणेशस्थापना केली जाते. या उपक्रमामुळे गावातील एकोपा, स्नेह आणि बंधुभाव दृढ होण्यास मदत होत असून अनावश्यक खर्चालाही आळा बसतो.



गावातील तरुण मंडळी स्वतः पर्यावरणपूरक सजावट, आरास आणि चलचित्रांचे देखावे तयार करतात. गणेशोत्सव काळात भजन, कीर्तन, काकड आरती, हरिपाठ, पारायण तसेच विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवाबरोबरच गौरी उत्सव, नवरात्रोत्सव आणि गोपाळकाला यांसारखे सणही ग्रामस्थ एकत्रितपणे साजरे करतात..



राजकीय मतभेद बाजूला ठेवून आबालवृद्ध, महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. २०२४ मध्ये जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘विघ्नहर्ता पुरस्कार’ मिळाल्याचेही सांगण्यात आले.
एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची ही परंपरा केवळ रिटघरपुरती मर्यादित न राहता इतर गावांसाठीही सामाजिक ऐक्य आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श ठरत आहे, अशी माहिती माजी सरपंच भारत भोपी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top