नवीन बातम्या
पनवेलमध्ये साडेनऊ लाखांची वीज चोरी उघड; एकावर गुन्हा दाखल
सेनेची बांधणी अधिक मजबूत करण्याासाठी पनवेलमध्ये बैठक संपन्न

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पनवेल महानगरपालिकेची शिवसेना शाखा तोड कारवाई परतावली
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %
बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह 
सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान संपन्न

बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी नामदेव गोंधळी यांचे पनवेलकरांना आवाहन

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा मतदार संघाचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन प्रकल्प्रस्त शेतकरी व न्यायालयीन लढा देण्यात प्रसिद्ध असलेले असे नामदेव गोंधळी यांनी पनवेलकरांना केले आहे.

जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून नामदेव गोंधळी हे शेतकरी शासनाविरोधात लढा देत आहेत व या लढ्याला आता यश मिळू लागले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी या संदर्भात पनवेल तालुक्यासह अलिबाग येथे सुद्धा 11 पत्रकार परिषद घेवून शासनाविरोधात आवाज उठविला आहे. या लढ्यामध्ये त्यांना प्रामुख्याने शेकाप नेते बाळाराम पाटील व जी.आर.पाटील यांची साथ व मार्गदर्शन लाभले आहे.

आज नामदेव गोंधळी यांच्या लढ्याला यश येत असले तरी त्यांना साथ देणारे बाळाराम पाटील यांना ते विसरले नसून त्यांचा प्रचार ते तनमनधनाने करीत आहेत व या निवडणुकीत शेतकरी बांधवांनी बाळाराम पाटील यांनाच मतदान करावे, शिट्टी समोरील बटण दाबावे असे आवाहन आपली 11 वी पत्रकार परिषदेत घेताना पत्रकार बांधवांच्या माध्यमातून केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top