नवीन बातम्या
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी भाषा, संस्कृती आणि धार्मिक ओळख धोक्यात; भारतात तिबेट हाऊस स्थापन करण्याची मागणी
समाजसेवेच्या व्यापक उद्देशाने ‘केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशन’ची स्थापना
रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन
क्रॉस बाँड्री बिझनेस संधी प्राप्त करण्याकरिता आणखीन एक पाऊल
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम करंजाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित..

साहित्य, कविता आणि सन्मानाचा संगम; पनवेलमध्ये ‘स्नेहबंध’ प्रकाशन सोहळा संपन्न
WordPress.org blog: WordPress 7.1 Release Candidate 1
WPTavern: #228 – Priscilla Collado Ramirez on Reducing WordPress Beginner Anxiety

बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी नामदेव गोंधळी यांचे पनवेलकरांना आवाहन

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा मतदार संघाचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन प्रकल्प्रस्त शेतकरी व न्यायालयीन लढा देण्यात प्रसिद्ध असलेले असे नामदेव गोंधळी यांनी पनवेलकरांना केले आहे.

जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून नामदेव गोंधळी हे शेतकरी शासनाविरोधात लढा देत आहेत व या लढ्याला आता यश मिळू लागले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी या संदर्भात पनवेल तालुक्यासह अलिबाग येथे सुद्धा 11 पत्रकार परिषद घेवून शासनाविरोधात आवाज उठविला आहे. या लढ्यामध्ये त्यांना प्रामुख्याने शेकाप नेते बाळाराम पाटील व जी.आर.पाटील यांची साथ व मार्गदर्शन लाभले आहे.

आज नामदेव गोंधळी यांच्या लढ्याला यश येत असले तरी त्यांना साथ देणारे बाळाराम पाटील यांना ते विसरले नसून त्यांचा प्रचार ते तनमनधनाने करीत आहेत व या निवडणुकीत शेतकरी बांधवांनी बाळाराम पाटील यांनाच मतदान करावे, शिट्टी समोरील बटण दाबावे असे आवाहन आपली 11 वी पत्रकार परिषदेत घेताना पत्रकार बांधवांच्या माध्यमातून केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top