नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी नामदेव गोंधळी यांचे पनवेलकरांना आवाहन

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा मतदार संघाचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन प्रकल्प्रस्त शेतकरी व न्यायालयीन लढा देण्यात प्रसिद्ध असलेले असे नामदेव गोंधळी यांनी पनवेलकरांना केले आहे.

जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून नामदेव गोंधळी हे शेतकरी शासनाविरोधात लढा देत आहेत व या लढ्याला आता यश मिळू लागले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी या संदर्भात पनवेल तालुक्यासह अलिबाग येथे सुद्धा 11 पत्रकार परिषद घेवून शासनाविरोधात आवाज उठविला आहे. या लढ्यामध्ये त्यांना प्रामुख्याने शेकाप नेते बाळाराम पाटील व जी.आर.पाटील यांची साथ व मार्गदर्शन लाभले आहे.

आज नामदेव गोंधळी यांच्या लढ्याला यश येत असले तरी त्यांना साथ देणारे बाळाराम पाटील यांना ते विसरले नसून त्यांचा प्रचार ते तनमनधनाने करीत आहेत व या निवडणुकीत शेतकरी बांधवांनी बाळाराम पाटील यांनाच मतदान करावे, शिट्टी समोरील बटण दाबावे असे आवाहन आपली 11 वी पत्रकार परिषदेत घेताना पत्रकार बांधवांच्या माध्यमातून केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top