नवीन बातम्या
माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण
खारघर पोलीस ठाणे मध्ये दर्शनी भागात शासकीय सेवांचे फलक; आवारात फुलपाखरु बाग
बांठिया विद्यालयात ’मेहफिल ए सुखन’ काव्य गजल संमेलन संपन्न
अज्ञात व्यक्तींकडून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने पैशांची मागणी; पोलिसांत तक्रार दाखल
ग्रामीण भागातून जे. एम. म्हात्रेंना वाढता पाठिंबा; भाजप प्रवेशाची तारीख पुढे ढकलली
जे . एन.म्हात्रे यांनी भाजपाची सुपारी घेतली का? – सुदाम पाटील यांचा सवाल
उरण विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीतील बिघाडीवर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा टोला..
महाविकास आघाडीची भूमिका मान्य नसल्यामुळे बाहेर पडतोय” – माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण
खारघर पोलीस ठाणे मध्ये दर्शनी भागात शासकीय सेवांचे फलक; आवारात फुलपाखरु बाग
बांठिया विद्यालयात ’मेहफिल ए सुखन’ काव्य गजल संमेलन संपन्न
अज्ञात व्यक्तींकडून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने पैशांची मागणी; पोलिसांत तक्रार दाखल
ग्रामीण भागातून जे. एम. म्हात्रेंना वाढता पाठिंबा; भाजप प्रवेशाची तारीख पुढे ढकलली
जे . एन.म्हात्रे यांनी भाजपाची सुपारी घेतली का? – सुदाम पाटील यांचा सवाल
उरण विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीतील बिघाडीवर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा टोला..
महाविकास आघाडीची भूमिका मान्य नसल्यामुळे बाहेर पडतोय” – माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न

माळरान ते हिरवाई; निर्जीव वन जमिनीला केले हरित समृद्ध

पनवेल (प्रतिनिधी) पडीक असलेल्या निर्जीव वनजमिनीला दीपक फर्टिलायझर्सने हरित करत समृद्ध केल्याने म्हाळुंगी येथील वनजमीन माळरान ते हिरवाई अशा प्रवासाने पुनर्जीवित झाली.



तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्सच्या प्रकल्पापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन निर्जीव अवस्थेत होती. आणि त्यामुळे निसर्गाची कुजबुज ओसरल्यासारखी वाटत होती, एक उजाड माळरान मागे सोडले होते, पण आशा हरपली नव्हती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार दीपक फर्टिलायझर्सने या १७.०६ एकर जागेत पुन्हा वृक्षांना जीवदान देण्याचे आव्हान स्वीकारले. आणि त्या अनुषंगाने  गेल्या तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे एकेकाळी निर्जीव झालेल्या वनक्षेत्राचे रूपांतर हरित परिसंस्थेत झाले आहे. एकेकाळी उजाड आणि ओसाड असलेला हा भाग आता जिवंत अधिवास, वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान म्हणून उभा राहिला आहे.



  दीपक फर्टिलायझर्सचे अध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) मुकुल अग्रवाल यांनी संदर्भात सांगितले कि, आमचे वन विकास प्रकल्प हे पर्यावरण संवर्धन आणिसामुदायिक कल्याणासाठी आमच्या अढळ बांधिलकीचे प्रतिबिंब आहेत. आमचा असा विश्वास आहे की, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, जैवविविधता सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडविण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत.

दीपक फर्टिलायझर्सने या भागात एकूण २ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक करून विविध प्रकारच्या औषधी, फळेदेणारी आणि देशी प्रजातींसह १३,४२० झाडे लावली आहेत.
कल्याण वनपरिक्षेत्रांतर्गत पिसावली गावाजवळील ५० एकर जागेत धावडी येथे दीपक फर्टिलायझर्सचा पहिला वन विकास उपक्रम सात वर्षांत



राबविण्यात आला. १ कोटी ८२  लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पात २२ हजार २०० वृक्षांची यशस्वी लागवड  करण्यात आली.  हे उपक्रम नीती आयोगाने नमूद केल्याप्रमाणे ३३ टक्के वन आणि वृक्षाच्छादन साध्य करण्याच्या भारताच्या मोठ्या उद्दिष्टाशी सुसंगत आहेत.  दीपक फर्टिलायझर्स भारताच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि शाश्वततेच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याच्या आपल्या ध्येयावर ठाम असून जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वासाठी एक बेंचमार्क स्थापित करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top