नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

उधाणाच्या पाण्याने घरांना तडे; नुकसान भरपाई अद्यापही प्रतीक्षेत

पनवेल (प्रतिनिधी) खाडी पाण्याच्या उधाणाने बांध तुटून नुकसान झालेल्या धेरंड येथील घरांचे सर्वेक्षण होऊन अद्यापही भरपाई न मिळाल्याने सदरचे घरमालक भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

अलिबाग तालुक्यातील शहापूर विभागातील धेरंड गावात १४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उधाणाच्या पाण्याने खाडीचे बांध तुटले आणि या पाण्याचा प्रवाह गोविंद कृष्णा पाटील तसेच मारुती कृष्णा पाटील, जनार्दन दया पाटील, मच्छिद्र नारायण पाटील, गणेश सुधाकर पाटील, जालिंदर बबन पाटील, चंद्रकांत पुंडलिक पाटील यांच्या घरांचा पाया खचला आणि त्या अनुषंगाने घरांच्या भितींना मोठे तडे जाऊन मोठे नुकसान झाले.

या संदर्भात १६ डिसेंबरला शहापूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी व तलाठी यांनी सर्वेक्षण केले होते. मात्र अद्यापही या घरांना भरपाई मिळाली नाही.  त्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली असून पाठपुरावा केला जात असला तरी हि घरे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत अडकली आहेत. या संदर्भात नाय मिळावा, अशी मागणी गोविंद पाटील व इतर ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top