नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

काळुंद्रे गाव आणि तक्का गाव यांच्या मधून वाहणार्‍या गाढी नदीच्या पात्राजवळच व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात भराव ; करण्यात येत आहे  कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी


पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गाव आणि तक्का गाव यांच्या मधून वाहणार्‍या गाढी नदीच्या पात्राजवळच व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. या भरावाच्या कामा दरम्यान नदीच्या पात्रातही भर टाकण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरातील गावामध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे तरी अशा प्रकारे बेकायदा भराव करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून महानगरपालिका आयुक्त मंंगेश चितळे यांच्याकडे करण्यात आली आहे.


आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उप शहर संघटक नंदू घरत यांच्यासह शहरप्रमुख प्रवीण जाधव व युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते यांनी महानगर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. पावसाळ्यात नेहमीच गाढी नदीचे पात्र ओसंडून वाहत असते ज्यामुळे काळुंद्रे गावात पाणी भरते. आता या भरावामुळे हे पाणी गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात भरून गावातील रहिवासी परिसरात मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तरी संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी नंदू घरत यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ दखल घ्यायची विनंती केली आहे. या मागणीची महापालिका आयुक्तांनी तात्काळ संबंधित विभागाला पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश या भेटी दरम्यान दिले आहेत. त्याचप्रमाणे तहसीलदार विजय पाटील यांनीही पाटबंधारे खात्याला याची तपासणी करण्याच्या सूचना करण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top