नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

जनजागृतीचा अभाव असल्याचे सांगत संतोष काटे यांनी केली खंत व्यक्त.

उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )
उलवे शहरातील व आजू बाजूच्या ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदार जागृतीची तीव्र गरज भासत आहे. काही भागांमध्ये खऱ्या मतदाराला मतदान करता न आल्याच्या तक्रारी सतत पुढे येत असून, अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे.उलवे शहरात व आजूबाजूच्या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाले आहे.मतदान संदर्भात नागरिकांना योग्य वेळी योग्य माहिती, योग्य मदत मिळत नाही. जनजागृती पाहिजे तशी होत नाही त्यामुळे अनेक नागरिकांना मतदान पासून वंचित राहावे लागल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी  खंत व्यक्त.
केली आहे.

यासाठी शासनाने त्वरित विविध उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.निवडणूक म्हणजे लोकशाहीचा कणा. मात्र उलवे भागातील काही परिसरात नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत, तर काहींनी मतदान केंद्रांची माहिती न मिळाल्यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे.
मतदारांची मागणी:-
स्थानिक रहिवाशांचा ठाम आग्रह आहे की, “खऱ्या मतदाराला त्याचे मतदान करता आले पाहिजे.” कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा यंत्रणात्मक अडथळा मतदाराच्या अधिकाराला बाधा ठरतो आणि त्यामुळे लोकशाहीची मूळ भावना धुसर होते.

आयोगाकडून जनजागृती हवी:-
निवडणूक आयोगाने उलवे परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यामध्ये मतदार यादीत नाव तपासण्याची प्रक्रिया, मतदान केंद्रांची माहिती, आणि मतदानाच्या तारखेबद्दल स्पष्ट मार्गदर्शन असावे.
स्थानिक संस्था पुढे याव्यात:-
स्थानिक सामाजिक संस्था, नागरीक मंडळे आणि शाळा–महाविद्यालयांनी मतदार जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम घ्यावेत. युवकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा आणि सर्वांनी मिळून ‘एक मत, लोकशाहीसाठी एक पाऊल’ या भावनेने पुढे यावे.



संपर्क केंद्रांची स्थापना:-
प्रत्येक प्रभागात मदत कक्ष उभारून तिथे नागरिकांना मार्गदर्शन देण्यात यावे. तसेच मतदार ओळखपत्र, नाव नोंदणी किंवा तक्रारींसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा विश्वास वाढेल.असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी व्यक्त केले आहे.मतदार, जागे व्हा – तुमचं एक मत बदल घडवू शकतं! असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी  खंत व्यक्त. केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top