नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

जीआरमध्ये फसवणूक झाली तर राज्यात मंत्री फिरु देणार नाहीत – जरांगे

पनवेल दि. २ (प्रतिनिधी)  4k समाचार
मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद मिळावी यासाठी मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारला अखेर निर्णय घ्यावा लागला असून, हैद्राबाद गॅझेटनुसार गावातील, नात्यातील आणि कुळातील सखोल तपासणी करून पात्रांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 



शासनाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) पुढील एका तासात जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या जीआरमध्ये कोणतीही फसवणूक झाल्यास राज्यातील एकही मंत्री फिरु देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आंदोलकांच्या दबावामुळे शासनाने सातारा गॅझेटसह कायदेशीर त्रुटी १५ दिवसांच्या आत दूर करण्याची हमी दिली आहे.
जरांगे पाटील यांनी शासन निर्णयामध्ये “मराठा-कुणबी एकच” अशी स्पष्ट नोंद करावी, ही मागणी पुन्हा ठामपणे पुढे मांडली. “सरकारने दिलेल्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवतो, मात्र समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. 



या निर्णयामुळे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातील आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली असून, संपूर्ण राज्यात आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे वातावरण आहे. दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेल्या उपोषणस्थळी हजारो आंदोलकांची गर्दी उसळली असून, शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top