नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींच्या ३५०व्या शहादत शताब्दी व श्री गुरु गोबिंद सिंह जींच्या ३५०व्या गुरता गादी शताब्दी राज्य स्तरावर साजरी करण्यात येणार



4k समाचार 
मुंबई: दिनांक: १३ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक व मैलाचा दगड ठरणारा निर्णय घेत १२ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या GR नुसार खालील दोन महान गुरुपर्व राज्य स्तरावर भव्य पद्धतीने साजरे केले जाणार आहेत –
• “हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींची ३५०वी शहादत शताब्दी”
• श्री गुरु गोबिंद सिंह जींची ३५०वी गुरता गादी शताब्दी 



हे दोन्ही ऐतिहासिक गुरुपर्व महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण सहकार्याने आणि शहादत शताब्दी समागम समित्यांच्या संयुक्त नियोजनातून आयोजित केले जातील.

📍 प्रमुख समागम स्थळे:
• नांदेड़ – १५ व १६ नोव्हेंबर २०२५
• नागपूर – ६ डिसेंबर २०२५
• नवी मुंबई (MMR) – २० व २१ डिसेंबर २०२५

GR मधील प्रमुख मुद्दे:

कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावरील समित्या गठीत केल्या जाणार
संत ज्ञानी हरनाम सिंह जी खालसा व ११ सदस्यीय सिख समन्वय समिती यांच्या भूमिकेची दखल
सिख, सिकलीगर, लबाणा, बंजारा, मोहयाल आणि इतर गुरु नानक नाम लेवा समाजाचा सक्रिय सहभाग
सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यवस्थापकीय बाबींमध्ये शासनाकडून पूर्ण सहकार्य

हा GR संपूर्ण महाराष्ट्रातील सिख समाजाने आनंदाने स्वागत केला असून, तो गुरु तेग बहादुर साहिब जींच्या शहादतीची आणि गुरु गोबिंद सिंह जींच्या शिकवणीची अधिकृत मान्यता असल्याचे मानले जात आहे.



निवेदन – संत ज्ञानी हरनाम सिंह जी खालसा:

“आम्ही महाराष्ट्र शासन व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ऐतिहासिक शताब्दींची अधिकृत दखल घेतली. गुरु साहिबांच्या कृपेने व शासनाच्या सहकार्याने हे समागम ऐक्य, बलिदान आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक ठरणार आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top