नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींच्या ३५०व्या शहादत शताब्दी व श्री गुरु गोबिंद सिंह जींच्या ३५०व्या गुरता गादी शताब्दी राज्य स्तरावर साजरी करण्यात येणार



4k समाचार 
मुंबई: दिनांक: १३ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक व मैलाचा दगड ठरणारा निर्णय घेत १२ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या GR नुसार खालील दोन महान गुरुपर्व राज्य स्तरावर भव्य पद्धतीने साजरे केले जाणार आहेत –
• “हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादुर साहिब जींची ३५०वी शहादत शताब्दी”
• श्री गुरु गोबिंद सिंह जींची ३५०वी गुरता गादी शताब्दी 



हे दोन्ही ऐतिहासिक गुरुपर्व महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण सहकार्याने आणि शहादत शताब्दी समागम समित्यांच्या संयुक्त नियोजनातून आयोजित केले जातील.

📍 प्रमुख समागम स्थळे:
• नांदेड़ – १५ व १६ नोव्हेंबर २०२५
• नागपूर – ६ डिसेंबर २०२५
• नवी मुंबई (MMR) – २० व २१ डिसेंबर २०२५

GR मधील प्रमुख मुद्दे:

कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावरील समित्या गठीत केल्या जाणार
संत ज्ञानी हरनाम सिंह जी खालसा व ११ सदस्यीय सिख समन्वय समिती यांच्या भूमिकेची दखल
सिख, सिकलीगर, लबाणा, बंजारा, मोहयाल आणि इतर गुरु नानक नाम लेवा समाजाचा सक्रिय सहभाग
सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यवस्थापकीय बाबींमध्ये शासनाकडून पूर्ण सहकार्य

हा GR संपूर्ण महाराष्ट्रातील सिख समाजाने आनंदाने स्वागत केला असून, तो गुरु तेग बहादुर साहिब जींच्या शहादतीची आणि गुरु गोबिंद सिंह जींच्या शिकवणीची अधिकृत मान्यता असल्याचे मानले जात आहे.



निवेदन – संत ज्ञानी हरनाम सिंह जी खालसा:

“आम्ही महाराष्ट्र शासन व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ऐतिहासिक शताब्दींची अधिकृत दखल घेतली. गुरु साहिबांच्या कृपेने व शासनाच्या सहकार्याने हे समागम ऐक्य, बलिदान आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक ठरणार आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top