नवीन बातम्या
आदर्श सरपंच सौ. निकिता संदीप पाटील यांचा ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान २०२६’ ने गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जनआरोग्य शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलची दैदिप्यमान कामगिरी; तब्बल १० बक्षिसांचा मान
पॅरा गेम्स आणि आशियाई पॅरा गेम्ससाठी भारतीय पॅरा-खेळाडूंना मिळणार एसबीआय लाईफचे बळ
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट कागदपत्रांच्या आधारे २.२९ कोटींची जमीन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मानवता फाउंडेशनतर्फे दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप; वृक्षारोपणातून निसर्ग संवर्धनाचा संदेश
*वर्षावास निमित्त धम्म बांधवांची गृह भेट उपक्रम*
पनवेलच्या विकास आराखड्याला गती; नगररचना संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

मानवता फाउंडेशनतर्फे दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप; वृक्षारोपणातून निसर्ग संवर्धनाचा संदेश

4kNews कामोठे दि. 2

पाच्छापूर (सुधागड) : सामाजिक बांधिलकी जपत मानवता फाउंडेशनच्या वतीने सुधागड तालुक्यातील दुर्गम भागातील सोमजाई शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय, पाच्छापूर येथील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत ये-जा करताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष संजयभाऊ पवार, उपाध्यक्ष विनोद नायर, सचिव विघ्नेश मगानी, संस्थेचे ट्रस्टी दीपकजी घोसाळकर, विशाल बाबर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 


या प्रसंगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सामाजिक सेवा आणि निसर्ग संवर्धन यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाबद्दल शाळेच्या प्रशासनाने व विद्यार्थ्यांनी मानवता फाउंडेशनचे आभार मानले. भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांद्वारे गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा मानस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top