4kNews कामोठे दि. 2
पनवेल: दिनांक २९ जुलै २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने वर्षावास (आषाढी पौर्णिमा) निमित्त धम्म बांधवांची गृह भेट हा उपक्रम उत्साहात पार पडला. तथागत बुद्धांच्या पहिल्या उपदेश दिनानिमित्त (धम्मचक्क पवत्तन सुत्त) आयोजित या कार्यक्रमास धम्म बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाचे सचिव आयु. मुकुंद रोटे व त्यांच्या परिवाराच्या निवासस्थानी, खादा कॉलनी, पनवेल येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित बांधवांच्या स्वागताने झाली. त्यानंतर कुटुंबाचा परिचय करून देण्यात आला.

कार्यक्रमात बुद्ध वंदना घेण्यात आली आणि उपस्थितांनी धम्माचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प व्यक्त केला. शेवटी उपस्थितांसाठी खीर व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमातून धम्म बंधुत्व वृद्धिंगत करण्यासह सामाजिक एकात्मता मजबूत करण्याचा संदेश देण्यात आला. वर्षावास दरम्यान मंडळाच्या वतीने अशा प्रकारचे उपक्रम दर रविवारी सकाळी १० ते ११ यावेळात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले..

