Social Media Ban: सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे अनेकांचा वेळ वाया जातोय. विशेषत: लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. सोशल मीडियात गुंतलेली मुले मैदानी खेळ खेळायला विसरली आहेत. वेळ अशी आलीय की सोशल मीडिया वापरु नको सांगितलं की मुलांना राग येतो. रागाच्या भरात मुले काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे मुलांना सोशल मीडिया वापरण्यावरुन रोखणं हे पालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ही अडचण आहे. पण असाही एक देश आहे, ज्याने मुलांच्या भवितव्याचा विचार करुन कठोर निर्णय घेतलाय.
Source
