(4kNews कोमोठे ) ः पनवेल तालुक्यातील मौजे वावंजे, ता.पनवेल स.नं.123/2 या या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादीत जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात फसवणूक झाल्याने न्याय देण्याची आज मागणी पनवेल शहरातील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात घेतलेल्या 11 व्या पत्रकार परिषदेमध्ये फसवणूक झालेले शेतकरी नामदेव शंकर गोंधळी यांनी केली आहे.

यावेळी बोलताना फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी यांनी सांगितले की, सदर जमीन फसवणूक सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल (आकारफोड पत्रकात) भु.अ.का.पनवेलच्या अधिकारी वर्गाने तसेच तत्कालीन तहसील कार्यालयातील पदाधिकारी व मंडळ अधिकार्यांनी पाठविलेल्या खोट्या तलाठी रिपोर्टच्या अनुषंगाने तसेच जमीन विकत घेणार्याने बाहेरुन आणलेल्या चुकीच्या लेखी पुरसिसच्या अनुषंगाने केलेली आहे.

यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून माझा तसेच माझ्या काकांचा व त्यांच्या मुलांची फसवणूक झाली असल्याचे गोंधळी यांचे म्हणणे आहे. तरी याबाबत शासनाने लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्याांनी आज केली आहे. याबाबत अनिल ढवळे व अॅड.शेळके यांनी सुद्धा या संदर्भात आम्ही फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गेांधळी यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले आहे.
