नवीन बातम्या
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार
कळंबोली बस स्थानकातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग परत

*जिवाची पर्वा न करता बीट मार्शल यानी पाण्यात   बुडत  असलेल्या महिलेचा जीव वाचवला*
रयत शिक्षण संस्थेला ३.६२ कोटींची देणगी; लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य गौरव 
सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील करता येणार थाटात विवाह सोहळा 
थ्री स्टार राज रिसॉर्ट यांचा स्तुत्य पुढाकार
पनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्तीपनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्ती
पनवेलसाठी सिडकोने पाणी उपलब्ध करून द्यावे
खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश
रायगड जिल्ह्यातील शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार

पनवेल महापालिकेच्या सूचना : जीवितहनी टाळण्यासाठी धोकादायक इमारती रिकाम्या करा
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने  धोकादायक इमारतींची यादी जाहीर


पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेने सन 2025-26 या आर्थिक वर्षात कार्यक्षेत्रातील अतिधोकादायक व धोकादायक इमारतींचे प्रभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात प्रभाग समिती अ- 18, प्रभाग समिती ब-15, प्रभाग समिती क- 10, प्रभाग समिती ड-37 अतंर्गत एकूण 80 सी-1 या प्रवर्गात मोडणार्‍या मिळकती जाहिर करण्यात आलेल्या आहेत.

सदर इमारतीतील रहिवाश्यांना त्यांच्या सदनिका रिक्त करण्याकरीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 265 व 268 नुसार, तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार, सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या अहवालानुसार, एकूण 80 धोकादायक इमारती असल्याचे निष्पन्न झाले आहे. या इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, अशा इमारतींतील नागरिकांनी तातडीने स्थलांतर करण्याबाबत महापालिकेच्यावतीने आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी सूचना दिल्या आहेत.

मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच राज्य शासनाने धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याबाबत निर्गमित केलेल्या आदेशानुसार मुळ मालक, भोगवटादार यांना पुरेशी संधी देऊनही संबंधितांनी इमारत रिक्त करुन पाडण्याची कार्यवाही केली नाही तर या इमारतीचा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा खंडीत करणे व त्यानुसार या इमारतींवर पोलीसांमार्फत निर्मनुष्य करुन पाडण्याची कार्यवाही मनपामार्फत करण्यात येत आहे.
धोकादायक इमारत मालकांनी स्वतःहुन सुरक्षितरित्या पाडण्याची कार्यवाही करावी. धोकादायक इमारत कोसळून काही दुर्घटना घडल्यास व त्यात जिवीत व वित्त हानी झाल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणार्‍या संबंधित नागरीकांची तसेच इमारतीचे मालक व भाडेकरु यांची राहील. त्याचप्रमाणे अतिधोकादायक मालमत्तांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याची जबाबदारी संबंधित घरमालक किंवा भोगवटादार यांची राहणार. याकरीता महानगरपालिका जबाबदार राहणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संपूर्ण माहिती ुुु.रिर्पींशश्रलेीिेीरींळेप.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच नागरिकांनी आपल्या आसपास धोकादायक इमारती असतील तर त्याची माहिती नजिकच्या प्रभाग अधिकार्‍यांना द्यावी.  जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी अशा धोकादायक इमारतींमध्ये राहू नये व दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अधिक माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री क्रमांक 1800-233-0009 वर तसेच 022-7458040/41/42 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त रविकिरण घोडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top