नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सज्जता; गरजेच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दलाची पथके त्वरित पाठवण्याच्या सूचना

4k समाचार दि. 21
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 



बैठकीदरम्यान पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली. पूरस्थिती नियंत्रण, नागरिकांची सुरक्षितता, अडकलेल्या लोकांचे स्थलांतर, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्कालीन सेवांची कार्यवाही यावर विशेष भर देण्यात आला.



मंत्री जाधव-पाटील यांनी गरजेच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची पथके तातडीने पाठवावीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top