मुंबई : 4k समाचार दि. 27
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मोर्चाचा मुक्काम जुन्नर येथे होणार असून २८ ऑगस्ट रोजी हा मोर्चा आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वीच पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी घातली होती. मात्र, जरांगे यांनी ठाम भूमिका घेत मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार दर्शवला आहे..

जालना पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी दिली असली तरी त्यावर तब्बल ४० अटी लादण्यात आल्या आहेत. या अटींमध्ये जातीय तेढ निर्माण करणारी विधाने न करण्याचे, शस्त्र न बाळगण्याचे, तसेच मालमत्तेचे नुकसान टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

