नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

अपघाताचे व वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता केली मागणी.


4k समाचार
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील उरण पनवेल मुख्य रस्त्यावर दास्तान फाटा येथे अपघाताचे तसेच वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण व भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी सिग्नल असणे अत्यावश्यक झाले आहे.आतापर्यंत त्या ठिकाणी आणि जासई ब्रिजजवळ आणि आसपास १७ अपघात झाले आहेत, त्यापैकी काही किरकोळ तर काही गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत, काही जणांना मृत्यूला देखील समोर जावे लागले आहे.म्हणून तेथे सिग्नल असणे अत्यावश्यक झाले आहे.भविष्यात त्याठिकाणी जे.एन.पी.टी नोड देखील नव्याने होणार आहे. 

अशावेळी रहदारी देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून कोणत्याही निष्पाप लोकांचे जीव धोक्यात जावू नये, कोणाचेही अपघात होऊ नये म्हणून दास्तान फाटा येथे सिग्नल बसविण्यात यावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांनी वाहतूक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी  तिरुपती काकडे (डी. सी.पी वाहतूक विभाग नवी मुंबई )यांच्याकडे पत्रव्यवहार करून केले आहे.

यावर लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन डीसीपी तिरुपती काकडे यांनी मयूर सुतार यांना दिले आहेत. याबाबतीत मयूर सुतार यांनी जेएनपीटी(जेएनपीए )व्यवस्थापक मनीषा जाधव यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनीही या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.मयूर सुतार यांनी सदर बाब जेएनपीटीचे मुख्य महा प्रबंधक डॉ. जी वैद्यनाथन यांच्याही निदर्शनास आणून दिली त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.जर दास्तान फाटा येथे सिग्नल झाल्यास अनेकांचे होणारे अपघात टळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर येथे सिग्नल असावे अशीही मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top