नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

अपघाताचे व वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता केली मागणी.


4k समाचार
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील उरण पनवेल मुख्य रस्त्यावर दास्तान फाटा येथे अपघाताचे तसेच वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण व भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी सिग्नल असणे अत्यावश्यक झाले आहे.आतापर्यंत त्या ठिकाणी आणि जासई ब्रिजजवळ आणि आसपास १७ अपघात झाले आहेत, त्यापैकी काही किरकोळ तर काही गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत, काही जणांना मृत्यूला देखील समोर जावे लागले आहे.म्हणून तेथे सिग्नल असणे अत्यावश्यक झाले आहे.भविष्यात त्याठिकाणी जे.एन.पी.टी नोड देखील नव्याने होणार आहे. 

अशावेळी रहदारी देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून कोणत्याही निष्पाप लोकांचे जीव धोक्यात जावू नये, कोणाचेही अपघात होऊ नये म्हणून दास्तान फाटा येथे सिग्नल बसविण्यात यावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांनी वाहतूक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी  तिरुपती काकडे (डी. सी.पी वाहतूक विभाग नवी मुंबई )यांच्याकडे पत्रव्यवहार करून केले आहे.

यावर लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन डीसीपी तिरुपती काकडे यांनी मयूर सुतार यांना दिले आहेत. याबाबतीत मयूर सुतार यांनी जेएनपीटी(जेएनपीए )व्यवस्थापक मनीषा जाधव यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनीही या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.मयूर सुतार यांनी सदर बाब जेएनपीटीचे मुख्य महा प्रबंधक डॉ. जी वैद्यनाथन यांच्याही निदर्शनास आणून दिली त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.जर दास्तान फाटा येथे सिग्नल झाल्यास अनेकांचे होणारे अपघात टळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर येथे सिग्नल असावे अशीही मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top